शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 09:27 IST

Raj Thackeray & Uddhav Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटही कमालीचा आक्रमक झालेला आहे. यादरम्यान, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो, असे संकेत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी दिले असून, उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे.

महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही. मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकतं. जसे तामिळनाडूमध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामिळ पक्ष एकत्र येतात, तसेच मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे? फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे, असं मत संदीप देशपांडे यांनी मांडलं आहे. संदीप देशपांडे यांच्या या विधानामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आगामी काळात राजकीयदृष्ट्या एकत्रिक येणार की केवळ मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर एकत्र लढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले होते. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणे, या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे यात मला फार कठीण गोष्ट वाटत नाही, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणे आवश्यक आहे. मी पाहतोच आहे. माझे तर असे म्हणणे आहे की सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.

तर राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो आहे. पण माझी एक अट आहे.. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचे आगत स्वागत मी करणार नाही त्यांच्या घरी जाणार नाही, त्याच्या पंगतीला मी बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी माझ्याकडून भांडणे नव्हतीच कोणाशी, मिटवून टाकली चला, असे त्यांनी सांगितले होते.  

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना