शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 09:27 IST

Raj Thackeray & Uddhav Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटही कमालीचा आक्रमक झालेला आहे. यादरम्यान, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो, असे संकेत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी दिले असून, उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे.

महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही. मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकतं. जसे तामिळनाडूमध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामिळ पक्ष एकत्र येतात, तसेच मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे? फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे, असं मत संदीप देशपांडे यांनी मांडलं आहे. संदीप देशपांडे यांच्या या विधानामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आगामी काळात राजकीयदृष्ट्या एकत्रिक येणार की केवळ मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर एकत्र लढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले होते. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणे, या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे यात मला फार कठीण गोष्ट वाटत नाही, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणे आवश्यक आहे. मी पाहतोच आहे. माझे तर असे म्हणणे आहे की सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.

तर राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो आहे. पण माझी एक अट आहे.. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचे आगत स्वागत मी करणार नाही त्यांच्या घरी जाणार नाही, त्याच्या पंगतीला मी बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी माझ्याकडून भांडणे नव्हतीच कोणाशी, मिटवून टाकली चला, असे त्यांनी सांगितले होते.  

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना