शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो; मविआबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 10:41 IST

नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही. अशाप्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात. तांबे कुटुंब काँग्रेसशी परांपरागत निष्ठावान कुटुंब आहे. त्यांच्यावर अविश्वास कोण दाखवेल? असा प्रश्न राऊतांनी केला.

मुंबई - महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार होतं, किमान समान कार्यक्रमावर ते सरकार चालवलं. ३ भिन्न विचारांच्या पक्ष एकत्र आले आणि सरकार बनवलं. या तिन्ही पक्षात समन्वय होता. ज्याप्रकारे सरकार चालवलं तो एकोपा विरोधी पक्षात काम करतानासुद्धा असायला हवा तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो ही भूमिका शिवसेनेची आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला तो नाकारू शकत नाही. काँग्रेस पक्षासोबत जी घटना घडली त्याकडे महाविकास आघाडीच्या दृष्टीने लक्ष द्यायला हवं होते. या ५ जागांच्या निवडणुकीबाबत एकत्रित बसून भूमिका ठरवणे, चर्चा करणे व्हायला हवं होते. ते दिसलं नाही. मी कुणालाही दोष देत नाही. नागपूर, अमरावतीच्या जागेबाबत काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे होते. अमरावतीत काँग्रेसकडे उमेदवार नव्हता त्यांनी आमचा माणूस घेतला मग आम्ही का नाही लढलो? आमचे बुलढाणा जिल्हाप्रमुख लिंगाडे यांनी तयारी केली होती. तुम्ही त्यांना पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली मग ती आम्हीच लढलो असतो आणि अधिक जोमाने लढलो असतो असं राऊतांनी म्हटलं. 

तसेच नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही. अशाप्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात. तांबे कुटुंब काँग्रेसशी परांपरागत निष्ठावान कुटुंब आहे. त्यांच्यावर अविश्वास कोण दाखवेल? तांबे यांच्या डोक्यात काय चाललंय आणि भाजपानं गुप्तपणे कारवाया केल्यात ते प्रत्येकवेळी आपल्याला समजतं असं नाही. त्यामुळे काँग्रेसला दोष देणार नाही. आम्हीही आमच्या पक्षात या प्रसंगाला सामोरे गेलोय. पण भविष्यात महाविकास आघाडी आणि आघाडीतील प्रमुख नेत्यांनी समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाहीत असंही संजय राऊतांनी विश्वास व्यक्त केला. 

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांसोबत युतीची शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. पण ती लपून राहिली नाही. त्याबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना माहिती देतो. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना कळवतो. त्यातून जो काही निकाल लागायचा तो कळेल. पण त्यातून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना समन्वय असणे गरजेचे आहे असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस