शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

...तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो; मविआबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 10:41 IST

नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही. अशाप्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात. तांबे कुटुंब काँग्रेसशी परांपरागत निष्ठावान कुटुंब आहे. त्यांच्यावर अविश्वास कोण दाखवेल? असा प्रश्न राऊतांनी केला.

मुंबई - महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार होतं, किमान समान कार्यक्रमावर ते सरकार चालवलं. ३ भिन्न विचारांच्या पक्ष एकत्र आले आणि सरकार बनवलं. या तिन्ही पक्षात समन्वय होता. ज्याप्रकारे सरकार चालवलं तो एकोपा विरोधी पक्षात काम करतानासुद्धा असायला हवा तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो ही भूमिका शिवसेनेची आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला तो नाकारू शकत नाही. काँग्रेस पक्षासोबत जी घटना घडली त्याकडे महाविकास आघाडीच्या दृष्टीने लक्ष द्यायला हवं होते. या ५ जागांच्या निवडणुकीबाबत एकत्रित बसून भूमिका ठरवणे, चर्चा करणे व्हायला हवं होते. ते दिसलं नाही. मी कुणालाही दोष देत नाही. नागपूर, अमरावतीच्या जागेबाबत काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे होते. अमरावतीत काँग्रेसकडे उमेदवार नव्हता त्यांनी आमचा माणूस घेतला मग आम्ही का नाही लढलो? आमचे बुलढाणा जिल्हाप्रमुख लिंगाडे यांनी तयारी केली होती. तुम्ही त्यांना पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली मग ती आम्हीच लढलो असतो आणि अधिक जोमाने लढलो असतो असं राऊतांनी म्हटलं. 

तसेच नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही. अशाप्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात. तांबे कुटुंब काँग्रेसशी परांपरागत निष्ठावान कुटुंब आहे. त्यांच्यावर अविश्वास कोण दाखवेल? तांबे यांच्या डोक्यात काय चाललंय आणि भाजपानं गुप्तपणे कारवाया केल्यात ते प्रत्येकवेळी आपल्याला समजतं असं नाही. त्यामुळे काँग्रेसला दोष देणार नाही. आम्हीही आमच्या पक्षात या प्रसंगाला सामोरे गेलोय. पण भविष्यात महाविकास आघाडी आणि आघाडीतील प्रमुख नेत्यांनी समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाहीत असंही संजय राऊतांनी विश्वास व्यक्त केला. 

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांसोबत युतीची शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. पण ती लपून राहिली नाही. त्याबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना माहिती देतो. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना कळवतो. त्यातून जो काही निकाल लागायचा तो कळेल. पण त्यातून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना समन्वय असणे गरजेचे आहे असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस