शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पुनर्विचार याचिकेतूनही काही फायदा नाहीच, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 7:12 AM

राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असेल तर त्यातून हाती काही लागण्याची शक्यता नाही, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचे मत.

मुंबई : ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देतानाच जी मूलभूत पाऊले उचलायला हवी होती ती उचलली गेली नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केली गेली नाही. आता राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असेल तर त्यातून हाती काही लागण्याची शक्यता नाही, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितले की ट्रिपल टेस्ट करा. समर्पित आयोग स्थापन करा, त्याच्यामार्फत ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा इम्पिरिकल डाटा तयार करा आणि एससी, एसटींचे आरक्षण वगळून ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींना आरक्षण द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले होते. 

घटनात्मक चौकटीत आरक्षण बसवायला हवे होते एकाहून अधिक निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले असताना आता राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली तरी फारसे काही हाती लागणार नाही. ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका घ्याव्या लागतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

ओबीसी आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला होता मात्र ते करताना त्याला घटनात्मक चौकटीत बसविण्याची खबरदारी सुरुवातीलाच घ्यायला हवी होती आणि समजा ती सुरुवातीला घेतली गेली नव्हती तर नंतरच्या काळात इतक्या वर्षांमध्ये हे आरक्षण घटनात्मक चौकटीत बसवायला हवे होते, असेही ॲड. अणे म्हणाले.

टॅग्स :Shrihri Anneश्रीहरी अणेMaharashtraमहाराष्ट्रOBCअन्य मागासवर्गीय जाती