शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:15 IST

Dharavi: पुनर्विकास झाल्यावर तरी या मुलांचे हरवलेले बालपण परत मिळेल का? असा प्रश्न पालकांसह सेवाभावी संस्थांना पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: खेळाची मैदाने आणि मोकळ्या जागांचा अभाव, दर्जेदार शिक्षणाची वानवा, अस्वच्छता, प्रदूषण आणि त्यामुळे सतत बिघडणारी प्रकृती, दारिद्रय, भविष्याची चिंता, आर्थिक संकटांमुळे नाईलाजाने करावी लागणारी बालमजुरी अशा अनेक समस्यांमध्ये धारावीतल्या मुलांचे बालपण हरवून गेले आहे. पुनर्विकास झाल्यावर तरी या मुलांचे हरवलेले बालपण परत मिळेल का? असा प्रश्न पालकांसह सेवाभावी संस्थांना पडला आहे.

धारावीत गटई काम करणाऱ्या अनिल भंडारी यांनी लहान मुलांच्या दैनंदिन आयुष्यातील संघर्षाबद्दल हळहळ व्यक्त केली. मला ३ मुले आहेत. पण तिघेही दिवसभर घरीच असतात. मुलांना मैदानी खेळ खेळता येत नाही. धारावीत माझे बालपण खेळण्याशिवाय गेले आणि आता मुलाचे बालपण वाया जात आहे.

राजीव गांधी नगरमध्ये राहणाऱ्या रेहान सय्यद यांनी मुलांच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली. माझ्या मुलींना मी घराबाहेर बिलकुल जाऊ देत नाही. जवळपास ग्रंथालय नाही, जिथे माझ्या मुली वाचनासाठी जाऊ शकतील. घरीच असल्याने त्या वारंवार मोबाईल बघतात. त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतोय, याची जाणीव मला आहे. पण माझा नाईलाज आहे. कारण मुलांना बाहेर पाठवले तर त्यांना व्यसन लागण्याची भीती आहे.

शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणामकायदेविषयक सल्लागार नूर खान गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून धारावीत सक्रिय आहेत.उपलब्ध शाळा आणि विद्यार्थी यांचे व्यस्त प्रमाण, यामुळे प्रत्येक वर्गात होणारी गर्दी, खेळाचे मैदान, ग्रंथालय अशा मूलभूत सुविधांशिवाय सुरूअसणाऱ्या शाळा यामुळे धारावीतल्या मुलांना शिक्षणाविषयी प्रेम किंवा आपुलकी जाणवतच नाही. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत आहे, अशी माहिती खान यांनी दिली.

शिक्षणाच्या अभावामुळे दारिद्र्याचे दुष्टचक्र- कचरा गोळा करून चरितार्थ चालविणाऱ्या संतोषी शिवराम कांबळे गेल्या ३ दशकांपासून धारावीतील महात्मा गांधी चाळीत राहत आहेत. माझा जन्म धारावीत झाला. - जन्मापासून धारावीची झोपडपट्टी मी जवळून बघतेय. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव यामुळे लहान मुलांना दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून बाहेर पडताच येत नाही.- हलाखीच्या परिस्थितीमुळे लहान मुले आपसूकच मजुरी, घरकाम, कचरा वेचणे आणि इतर हलक्या कामांकडे वळतात.

टॅग्स :dharavi-acधारावीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र