शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:15 IST

Dharavi: पुनर्विकास झाल्यावर तरी या मुलांचे हरवलेले बालपण परत मिळेल का? असा प्रश्न पालकांसह सेवाभावी संस्थांना पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: खेळाची मैदाने आणि मोकळ्या जागांचा अभाव, दर्जेदार शिक्षणाची वानवा, अस्वच्छता, प्रदूषण आणि त्यामुळे सतत बिघडणारी प्रकृती, दारिद्रय, भविष्याची चिंता, आर्थिक संकटांमुळे नाईलाजाने करावी लागणारी बालमजुरी अशा अनेक समस्यांमध्ये धारावीतल्या मुलांचे बालपण हरवून गेले आहे. पुनर्विकास झाल्यावर तरी या मुलांचे हरवलेले बालपण परत मिळेल का? असा प्रश्न पालकांसह सेवाभावी संस्थांना पडला आहे.

धारावीत गटई काम करणाऱ्या अनिल भंडारी यांनी लहान मुलांच्या दैनंदिन आयुष्यातील संघर्षाबद्दल हळहळ व्यक्त केली. मला ३ मुले आहेत. पण तिघेही दिवसभर घरीच असतात. मुलांना मैदानी खेळ खेळता येत नाही. धारावीत माझे बालपण खेळण्याशिवाय गेले आणि आता मुलाचे बालपण वाया जात आहे.

राजीव गांधी नगरमध्ये राहणाऱ्या रेहान सय्यद यांनी मुलांच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली. माझ्या मुलींना मी घराबाहेर बिलकुल जाऊ देत नाही. जवळपास ग्रंथालय नाही, जिथे माझ्या मुली वाचनासाठी जाऊ शकतील. घरीच असल्याने त्या वारंवार मोबाईल बघतात. त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतोय, याची जाणीव मला आहे. पण माझा नाईलाज आहे. कारण मुलांना बाहेर पाठवले तर त्यांना व्यसन लागण्याची भीती आहे.

शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणामकायदेविषयक सल्लागार नूर खान गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून धारावीत सक्रिय आहेत.उपलब्ध शाळा आणि विद्यार्थी यांचे व्यस्त प्रमाण, यामुळे प्रत्येक वर्गात होणारी गर्दी, खेळाचे मैदान, ग्रंथालय अशा मूलभूत सुविधांशिवाय सुरूअसणाऱ्या शाळा यामुळे धारावीतल्या मुलांना शिक्षणाविषयी प्रेम किंवा आपुलकी जाणवतच नाही. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत आहे, अशी माहिती खान यांनी दिली.

शिक्षणाच्या अभावामुळे दारिद्र्याचे दुष्टचक्र- कचरा गोळा करून चरितार्थ चालविणाऱ्या संतोषी शिवराम कांबळे गेल्या ३ दशकांपासून धारावीतील महात्मा गांधी चाळीत राहत आहेत. माझा जन्म धारावीत झाला. - जन्मापासून धारावीची झोपडपट्टी मी जवळून बघतेय. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव यामुळे लहान मुलांना दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून बाहेर पडताच येत नाही.- हलाखीच्या परिस्थितीमुळे लहान मुले आपसूकच मजुरी, घरकाम, कचरा वेचणे आणि इतर हलक्या कामांकडे वळतात.

टॅग्स :dharavi-acधारावीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र