शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

...तर मग पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना! अजित पवारांचा पाटलांना चिमटा

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 26, 2020 13:58 IST

पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन,  पुन्हा येईन असे म्हणत होते. आता ते दुसरे त्यांचे सहकारी म्हणतात, मी परत जाईन, परत जाईन...

पुणे : एक वर्ष होण्याआधीच ते कोल्हापूरला परत जाण्याची वक्तव्य करू लागले आहे. कोथरूडकरांनी त्यांना पूर्ण पाच वर्षांकरिता निवडून दिले आहे. या कालावधीत कोथरुडचे प्रश्न मार्गी लागावेत. आणि विकास व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. उद्या नागरिक त्यांच्याकडे आपले काम घेऊन गेले तर ते म्हणायचे मी कोल्हापूरला परत जाणार आहे. पण मग परत जायचंच होतं तर पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना... अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर चिमटा काढला आहे. 

पुण्यातील विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन,  पुन्हा येईन असे म्हणत होते. आता ते दुसरे त्यांचे सहकारी म्हणतात, मी परत जाईन, परत जाईन. पण त्यांना कुणी पुणेकरांनी पुण्यात या असे बोलावलंच नव्हतं ना. पण एक झालं ते म्हणजे त्यांच्या पुण्यात येण्याने आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी व त्यांच्या कार्यकर्ते कारण नसताना नाराज झाले. 

पुण्यात अटल गौरव पुरस्कार सोहळ्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'पुणे सगळ्यांना आपलेसे करून घेते, प्रत्येकाला इथे सेटल व्हावे असे वाटते', असा उल्लेख करत 'देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे, माझ्या विरोधकांनाही सांगून टाका', असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात काही दिवस तरी जोरदार चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. आता या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. 

चंद्रकांत पाटलांनी त्यांचं काम करत राहावे आम्ही आमचे करत राहू. आम्ही त्यांना अजिबात त्रास देणार नाही. पण केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत असे ते सांगतात तर आज तो रस्त्यावर का उतरला आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत देखील तिथे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन का सुरु आहे याचं आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पुण्यात येऊन फडणवीसांनी फक्त बैलगाडीत फोटो काढले. पण बैलगाडीत फोटो काढण्यापेक्षा फडणवीसांनी दिल्लीत जाऊन गोठणार्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलावं असा जोरदार टोला लगावला.तसेच दिल्लीच्या आंदोलनात महाराष्ट्रातून देखील अनेक शेतकरी सहभागी झाले आहे हे देखील यावेळी पवारांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण