शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

...तर मग पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना! अजित पवारांचा पाटलांना चिमटा

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 26, 2020 13:58 IST

पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन,  पुन्हा येईन असे म्हणत होते. आता ते दुसरे त्यांचे सहकारी म्हणतात, मी परत जाईन, परत जाईन...

पुणे : एक वर्ष होण्याआधीच ते कोल्हापूरला परत जाण्याची वक्तव्य करू लागले आहे. कोथरूडकरांनी त्यांना पूर्ण पाच वर्षांकरिता निवडून दिले आहे. या कालावधीत कोथरुडचे प्रश्न मार्गी लागावेत. आणि विकास व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. उद्या नागरिक त्यांच्याकडे आपले काम घेऊन गेले तर ते म्हणायचे मी कोल्हापूरला परत जाणार आहे. पण मग परत जायचंच होतं तर पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना... अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर चिमटा काढला आहे. 

पुण्यातील विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन,  पुन्हा येईन असे म्हणत होते. आता ते दुसरे त्यांचे सहकारी म्हणतात, मी परत जाईन, परत जाईन. पण त्यांना कुणी पुणेकरांनी पुण्यात या असे बोलावलंच नव्हतं ना. पण एक झालं ते म्हणजे त्यांच्या पुण्यात येण्याने आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी व त्यांच्या कार्यकर्ते कारण नसताना नाराज झाले. 

पुण्यात अटल गौरव पुरस्कार सोहळ्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'पुणे सगळ्यांना आपलेसे करून घेते, प्रत्येकाला इथे सेटल व्हावे असे वाटते', असा उल्लेख करत 'देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे, माझ्या विरोधकांनाही सांगून टाका', असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात काही दिवस तरी जोरदार चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. आता या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. 

चंद्रकांत पाटलांनी त्यांचं काम करत राहावे आम्ही आमचे करत राहू. आम्ही त्यांना अजिबात त्रास देणार नाही. पण केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत असे ते सांगतात तर आज तो रस्त्यावर का उतरला आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत देखील तिथे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन का सुरु आहे याचं आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पुण्यात येऊन फडणवीसांनी फक्त बैलगाडीत फोटो काढले. पण बैलगाडीत फोटो काढण्यापेक्षा फडणवीसांनी दिल्लीत जाऊन गोठणार्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलावं असा जोरदार टोला लगावला.तसेच दिल्लीच्या आंदोलनात महाराष्ट्रातून देखील अनेक शेतकरी सहभागी झाले आहे हे देखील यावेळी पवारांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण