शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

...तर महाविद्यालये सुरु करण्याबाबत होऊ शकतो पुनर्विचार: उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 14:51 IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काॅलेज सुरु करायचे का नाही याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना..

पुणे :  कोरोना वाढत असेल तर काॅलेज सुरु करण्याबाबत फेरविचार केला जाउ शकतो असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. 'लोकमत'ला दिलेल्या 'Exclusive' मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काॅलेज सुरु करायचे का नाही याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेउन जिल्हाधिकारी निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थांना उपस्थिती सक्तीची करु नये असेही ते म्हणाले. “

सामंत म्हणाले, कोरोना गेला आहे असे जर कोणाला वाटत असेल तर तसं नाहीये. संख्या वाढते आहे. आणि हे लक्षात घेता आज विद्यापीठांना देखील आमच्या सुचना गेल्या आहेत. जर हे असेच कायम राहिले तर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला काही विचार करावा लागेल. काॅलेज उघडण्याबाबत नक्कीच फेरविचार करु शकतो. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अधिकार दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवुन विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा. त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय विद्यापीठांनी उपलब्ध करुन द्यावेत. विद्यार्थी त्यांच्या घरूनच परिक्षा देवु शकतात असेही सामंत यांनी सांगितले. 

ऑनलाईन परीक्षांबाबत येणाऱ्या अडचणींसाठी एक समिती नेमली होती. या अडचणी एका महिन्यात त्याचा अहवाल येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ परीक्षांमध्ये काय अडचणी आल्या याबाबत एक समिती नेमली आहे. या समितीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग  माध्यमातून सर्व विद्यापिठांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. ते महिनाभरात याबाबतचा देतील. त्यानंतर जर कोण दोषी आढळेल तर त्यांच्यासह कारवाई होईल” असेही सामंत  यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या