शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

...तर महाविद्यालये सुरु करण्याबाबत होऊ शकतो पुनर्विचार: उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 14:51 IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काॅलेज सुरु करायचे का नाही याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना..

पुणे :  कोरोना वाढत असेल तर काॅलेज सुरु करण्याबाबत फेरविचार केला जाउ शकतो असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. 'लोकमत'ला दिलेल्या 'Exclusive' मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काॅलेज सुरु करायचे का नाही याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेउन जिल्हाधिकारी निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थांना उपस्थिती सक्तीची करु नये असेही ते म्हणाले. “

सामंत म्हणाले, कोरोना गेला आहे असे जर कोणाला वाटत असेल तर तसं नाहीये. संख्या वाढते आहे. आणि हे लक्षात घेता आज विद्यापीठांना देखील आमच्या सुचना गेल्या आहेत. जर हे असेच कायम राहिले तर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला काही विचार करावा लागेल. काॅलेज उघडण्याबाबत नक्कीच फेरविचार करु शकतो. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अधिकार दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवुन विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा. त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय विद्यापीठांनी उपलब्ध करुन द्यावेत. विद्यार्थी त्यांच्या घरूनच परिक्षा देवु शकतात असेही सामंत यांनी सांगितले. 

ऑनलाईन परीक्षांबाबत येणाऱ्या अडचणींसाठी एक समिती नेमली होती. या अडचणी एका महिन्यात त्याचा अहवाल येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ परीक्षांमध्ये काय अडचणी आल्या याबाबत एक समिती नेमली आहे. या समितीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग  माध्यमातून सर्व विद्यापिठांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. ते महिनाभरात याबाबतचा देतील. त्यानंतर जर कोण दोषी आढळेल तर त्यांच्यासह कारवाई होईल” असेही सामंत  यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या