शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
2
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
3
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
4
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
5
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
6
आता काय बॉउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
7
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
8
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
9
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
10
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
11
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
12
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
13
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
14
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
15
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
16
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
17
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
18
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
19
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
20
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!

...तर आर. आर. पाटील वाचले असते - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 21:04 IST

राज्यातील अनेक तरूणांना व्यसनांपासून राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वाचवले. मात्र आबांना स्वत:ला झालेल्या कॅन्सर....

 पुणे - राज्यातील अनेक तरूणांना व्यसनांपासून राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वाचवले. मात्र आबांना स्वत:ला झालेल्या कॅन्सरची लक्षणे योग्य वेळी कळालीच नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास उशिर झाला. योग्य वेळी माहिती कळाली असती तर आबा वाचले असते, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच तरूणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे त्यांनी या वेळी आवाहन केले. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आर. आर. पाटील (आबा) कॅन्सर साक्षर व कॅन्सर मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथील कार्यक्रमात करण्यात आला. 

अजित पवार म्हणाले, की निर्व्यसनी लोकांना कॅन्सर होतो. सध्या पिके घेताना मोठ्या प्रमाणात किटकनाशके वापरतात. त्यामुळे निर्व्यसनी नागरिकांना कॅन्सर होतो. मंत्रालायात आल्यावर माणसांना नैराश्य येतात. मंत्रालयात माणसं आयुष्य संपवतात. चुकीच्या पध्दतीचा मार्ग नागरिकांनी अवलबंू नये. आत्महत्या करू नये. कॅन्सरची जनजागृती व साक्षरता मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. जिल्हा परिषद प्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिचवड मध्ये हे अभियान राबविण्याची गरज आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती राणी शेळके, समाज कल्याण सभापती सुरेखा चौरे, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रशांत जगताप, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने उपस्थित होते.  

सध्याच्या तरूणी बिनधास्त व्यसनं करतात.... 

अनेकदा जाहिर सभांमधून आर. आर. पाटील यांना तंबाखू खाऊ नका, असे आवाहन केले होते. मात्र ते तंबाखू सोडू शकले नाही. व्यसनामुळे अनेक कुटुंब उदधवस्त झाल्याचे मी पाहिले आहे. पुणे आणि मुंबईमध्ये हुक्का पार्लरची संस्कृती निर्माण होत आहे. हल्ली तरूण मुली मोठ्या प्रमाणात सिगारेट अथवा इतर व्यसन करत असल्याचे चित्र आहे. तंबाखू सारख्या व्यसनामुळे कॅन्सरचा धोका असतो. वैद्यकिय संशोधनामुळे कॅन्सर पहिल्या टप्प्यामध्ये बरा होत आहे. मात्र त्यासाठी काळजी घेणे आवश्यक असून, प्राथमिक लक्षण समजणे महत्त्वाचे आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केली. पण सगळ्याकडे अशी इच्छाशक्ती नसते, असे अजित पवार या वेळी म्हणाले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारcancerकर्करोगMaharashtraमहाराष्ट्र