शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

...तर आर. आर. पाटील वाचले असते - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 21:04 IST

राज्यातील अनेक तरूणांना व्यसनांपासून राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वाचवले. मात्र आबांना स्वत:ला झालेल्या कॅन्सर....

 पुणे - राज्यातील अनेक तरूणांना व्यसनांपासून राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वाचवले. मात्र आबांना स्वत:ला झालेल्या कॅन्सरची लक्षणे योग्य वेळी कळालीच नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास उशिर झाला. योग्य वेळी माहिती कळाली असती तर आबा वाचले असते, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच तरूणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे त्यांनी या वेळी आवाहन केले. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आर. आर. पाटील (आबा) कॅन्सर साक्षर व कॅन्सर मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथील कार्यक्रमात करण्यात आला. 

अजित पवार म्हणाले, की निर्व्यसनी लोकांना कॅन्सर होतो. सध्या पिके घेताना मोठ्या प्रमाणात किटकनाशके वापरतात. त्यामुळे निर्व्यसनी नागरिकांना कॅन्सर होतो. मंत्रालायात आल्यावर माणसांना नैराश्य येतात. मंत्रालयात माणसं आयुष्य संपवतात. चुकीच्या पध्दतीचा मार्ग नागरिकांनी अवलबंू नये. आत्महत्या करू नये. कॅन्सरची जनजागृती व साक्षरता मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. जिल्हा परिषद प्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिचवड मध्ये हे अभियान राबविण्याची गरज आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती राणी शेळके, समाज कल्याण सभापती सुरेखा चौरे, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रशांत जगताप, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने उपस्थित होते.  

सध्याच्या तरूणी बिनधास्त व्यसनं करतात.... 

अनेकदा जाहिर सभांमधून आर. आर. पाटील यांना तंबाखू खाऊ नका, असे आवाहन केले होते. मात्र ते तंबाखू सोडू शकले नाही. व्यसनामुळे अनेक कुटुंब उदधवस्त झाल्याचे मी पाहिले आहे. पुणे आणि मुंबईमध्ये हुक्का पार्लरची संस्कृती निर्माण होत आहे. हल्ली तरूण मुली मोठ्या प्रमाणात सिगारेट अथवा इतर व्यसन करत असल्याचे चित्र आहे. तंबाखू सारख्या व्यसनामुळे कॅन्सरचा धोका असतो. वैद्यकिय संशोधनामुळे कॅन्सर पहिल्या टप्प्यामध्ये बरा होत आहे. मात्र त्यासाठी काळजी घेणे आवश्यक असून, प्राथमिक लक्षण समजणे महत्त्वाचे आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केली. पण सगळ्याकडे अशी इच्छाशक्ती नसते, असे अजित पवार या वेळी म्हणाले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारcancerकर्करोगMaharashtraमहाराष्ट्र