शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...तर राष्ट्रवादी महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येऊ शकेल; जयंत पाटील यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 21:15 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना मोठा संदेश दिला आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना मोठा संदेश दिला आहे.  प्रबळ विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका बजावल्यास 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या बळावर सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.  जयंत पाटील म्हणाले की, ''दिल्लीसमोर झुकायचं नाही हे शरद पवार यांनी दाखवून दिलं आहे. आता सर्व नवनिर्वाचित आमदारांना माझे आवाहन आहे की त्यांनी सभागृहाच्या कामकाजात जास्तीतजास्त भाग घ्यावा. पुढची पाच वर्षे विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडत राहिले पाहिजे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका बजावल्यास 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या बळावर सत्ता स्थापन करू शकेल,''यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपावाले काश्मीरचा मुद्दा मांडत राहिले. मात्र आम्ही जनतेचे प्रश्न मांडले, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कमी जागांवर लढत जास्त जागा जिंकल्या आहेत. पक्षाला राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेच्या विधिमंडळ नेतेपदी अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अजित पवार यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र