शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

...तर राष्ट्रवादी महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येऊ शकेल; जयंत पाटील यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 21:15 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना मोठा संदेश दिला आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांना मोठा संदेश दिला आहे.  प्रबळ विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका बजावल्यास 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या बळावर सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.  जयंत पाटील म्हणाले की, ''दिल्लीसमोर झुकायचं नाही हे शरद पवार यांनी दाखवून दिलं आहे. आता सर्व नवनिर्वाचित आमदारांना माझे आवाहन आहे की त्यांनी सभागृहाच्या कामकाजात जास्तीतजास्त भाग घ्यावा. पुढची पाच वर्षे विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडत राहिले पाहिजे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका बजावल्यास 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या बळावर सत्ता स्थापन करू शकेल,''यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपावाले काश्मीरचा मुद्दा मांडत राहिले. मात्र आम्ही जनतेचे प्रश्न मांडले, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कमी जागांवर लढत जास्त जागा जिंकल्या आहेत. पक्षाला राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेच्या विधिमंडळ नेतेपदी अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अजित पवार यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र