शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; भाजपाच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 22:42 IST

ते चांगले आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे वक्तव्य करतात त्याकडे सध्या राज्याचे लक्ष लागून असते असं दानवेंनी सांगितले

मुंबई - राज्यात मुख्यमंत्रिपदावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. २०१९ च्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपाचे बिनसले आणि उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणले. कुठलाही प्रशासकीय अनुभव नसताना उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले. आता अजित पवार यांनाही मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. त्यात भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजितदादाही मुख्यमंत्री होऊ शकतात असं विधान केले आहे. 

मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या वेळीस काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढले, राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या त्यावेळीही अजित पवारांना मुख्यमंत्री होता आले नाही. राजकारणातील ही घटना सगळ्यांना माहिती आहे. दावा करणे आणि बहुमत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर बहुमताच्या बाजूने अजित पवार आले किंवा १०-२० वर्षांनी कधी त्यांना बहुमत मिळाले तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. ते चांगले आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे वक्तव्य करतात त्याकडे सध्या राज्याचे लक्ष लागून असते असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले अजित पवार?‘२०२४ मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, ‘२०२४ काय आत्ताही मुख्यमंत्री बनण्याची तयारी आहे. राज्याचा मुख्यमंत्री व्हायला १०० टक्के आवडेल असं विधान करून अजित पवार यांनी धमाल उडवून दिली आहे. मात्र, कोणत्या सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हायला आवडेल, हे मात्र पवार यांनी सांगितले नाही. त्यामुळे गुढता कायम आहे. भाजपा प्रवेशाविषयी कोणताही खुलासा पवार यांनी केला नाही.

२००४ साली संधी गेलीराष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. परंतु राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. त्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. काँग्रेसच्या लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर २००४ मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर आर पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते असंही अजित पवार म्हणाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारraosaheb danveरावसाहेब दानवेNCPराष्ट्रवादी काँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री