शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

कवी आमदार होतो तेव्हाची गोष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 2:48 PM

शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती. 

नकवी ना. धों. महानोर यांची विधान परिषदेतील १२ वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक भाषणे ही कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक होती. कृषीविषयक  धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महानोर यांचे विचार राज्य सरकारसाठी दिशादर्शक ठरले. शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती. 

शेतकऱ्यांच्या विपन्नावस्थेविषयी ते म्हणाले होते, की या विषयावर तेच ते बोलण्याचा मला कंटाळा आला आहे. तेच ते आणि तेच ते ही विंदा करंदीकरांची कविता मला आठवते. राज्यकर्त्यांच्या संवेदना गोठून गेल्या आहेत असे वाटते.  तेच ते पाणी, तेच ते राज्य, मंत्रीही तेच ते असे सगळे चालले आहे. 

सत्ता, मुख्यमंत्री बदलले की आपली कृषिविषयक धोरणे बदलतात असे होऊ नये. दहा वर्षे एकात्मिक कार्यक्रम कोणताही बदल न करता राबविला तर सात वर्षांतच त्याची यशस्वी अंमलबजावणी होऊ शकेल. ज्या गावचे मजूर, त्याच गावची माती, त्याच गावचे पाणी, त्याच गावची झाडे यानुसार सारे उभे केले पाहिजे.   

महानोर यांच्या भाषणांतून...- वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना पाणी अडवा पाणी जिरवा, असे त्यांनी सांगितले होते. पाणी अडवा बदलले, जलसंधारण हे नाव आले, माणसे बदलली, नावे बदलली; पण शेतकऱ्यांचे नशीब नाही बदलले. 

- इस्राइलसारखे देश स्वत:च्या दु:खाची भैरवी गात बसले नाहीत. देशाविषयीचा एकसंधपणा त्यांच्याकडे आहे;  आपण त्यात आणि नियोजनात कमी पडतो. इस्राइल, जर्मनी, जपानचे शास्त्र व तंत्रज्ञान आपण शेतीत वापरत नाही तोवर इथे चर्चा करून काहीही होणार नाही. इस्राइलचे पाणी वाटपाचे तंत्र आपण वापरले तर तिप्पट पाणी मिळेल. 

- उसासाठी शेतीला वारेमाप पाणी दिले जाते. हे तर असे आहे की श्रीमंत माणसाला डायबिटीस झाला आहे आणि कोरडवाहू शेतकरी जगू शकत नाही. हा बागायती आणि कोरडवाहू शेतीतील फरक आहे.   

टॅग्स :literatureसाहित्यMLAआमदारMaharashtraमहाराष्ट्र