शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट आता स्क्रिप्ट रायटर बदला; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 21:22 IST

आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजपा महायुती म्हणून लढवणार आहोत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट, त्याचीच पुनरावृत्ती, स्क्रिप्ट रायटर तरी बदलायला सांगा. आम्ही आरोपांना उत्तर कामाने देणार. हेच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. पानवाला, टपरीवाला, रिक्षावाला याच लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली. त्याच लोकांना तुम्ही हिणवता. बाळासाहेबांची एक डरकाळी फुटल्यानंतर देश स्तब्ध व्हायचा ते याच लोकांमुळे, स्वत:चा जीव धोक्यात घातला, कुटुंबाची पर्वा केली नाही. कितीतरी लोकांचे जीव शिवसेना वाढवण्यासाठी जीव गेले, अनेकांनी जेल भोगली, तुम्ही कुठे होता, किती केस झाल्या तुमच्यावर? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री यामागे कष्ट होते, बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांची साथ होती. श्रीकांत शिंदे डॉक्टर झाला, त्याने हॉस्पिटल करून द्या अशी एक गोष्ट मागितली. पण त्याला हॉस्पिटल देता आले नाही. एकनाथ शिंदेंनी कर्ज काढून निवडणुका लढवल्या आहेत. मिळेल ते काम केले, कष्ट केले, वयाच्या २० व्या वर्षी बेळगावच्या जेलमध्ये ४० दिवस होता. कितीतरी केसेस दाखल झाल्या. व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी तेच भोगलेय म्हणून शिवसेना मोठी झाली, पुढे गेली असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवसेनाप्रमुखांचे विचार आपण पुढे नेण्याचे धाडस केले आहे. वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघाले असं बोलता, पण तुमच्यासारख्या कोल्ह्यांची कुईकुई वाघ डरकाळी फोडत नाही तिथपर्यंत असते. २० तारखेला उठाव, क्रांतीदिन, स्वाभिमान दिन करायला देखील वाघाचे काळीज लागते. एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री असला तरी माझ्यात काही बदल झाला नाही. जसा आहे तसाच आहे. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

....माझ्याकडे २ पेन आहेतसरकार पडणार, पडणार असे वारंवार बोलत होते, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता हे सरकार पडणार नाही हे फिक्स झाल्यामुळे काल बोलले नाही. तुमच्या खोटारडेपणाला जनता साथ देणार नाही. शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरमध्ये बसू नये, चांगल्या गाडीने फिरू नये. मी शेतकरी म्हणून शेती करतो. तुम्ही सरकार चालवायचे सोडून गाडी चालवत होतात. मी गाडीतून जेव्हा जात होतो तेव्हा फाईली घेऊन जातो, रस्त्यात कामे करतो. अडीच वर्षात जितक्या सह्या झाल्या नाहीत तितक्या १ दिवसांत करतो. अगोदरचे मुख्यमंत्री पेन ठेवत नव्हते माझ्याकडे २ पेन आहेत. मुख्यमंत्री सहायत्ता निधीचे पैसे अडीच वर्षात २ कोटी वाटले, पण मी आल्यानंतर १ वर्षात ७५ कोटी वाटले असंही शिंदेंनी सांगितले. 

आगामी निवडणुका शिवसेना-भाजपा म्हणून लढवणारगाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक झाला पाहिजे, शाखेतला माणूस घरात गेला पाहिजे, घरातला माणूस शाखेत आला पाहिजे हे बाळासाहेबांनी सांगितले, मुंबईत जे कोविड काळात घोटाळे झाले, तुम्ही पैसे बनवत होता, याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल, १५ वर्षापूर्वी रस्त्यांचा सिमेंट क्रॉंकिटचा घेतला असला तर मुंबईकरांचे साडे तीन हजार कोटी वाचले असते. आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजपा महायुती म्हणून लढवणार आहोत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकार काम करतंय, शासन आपल्या दारी प्रकल्प सुरू आहे. आपण त्यामधला दुवा बनून लोकांपर्यंत पोहचा, एका छताखाली सर्व दाखले मिळतायेत. हे लोकांपर्यंत पोहचावा असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना