शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल, कारण...; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:29 IST

या वर्षभरात देशात ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निकालाचा मोदी सरकारवर परिणाम होण्याची शक्यता काँग्रेसने वर्तवली आहे. 

मुंबई - पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल अशी शक्यता आहे. अटल बिहारी वाजपेयींचे सरकार १३ महिन्यात गेले होते त्याची पुनरावृत्ती होताना दिसेल असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हरियाणात जर भाजपाला त्यांचे सरकार टिकवता आले तर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल अशी भाजपाला आशा आहे. मात्र हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्येही भाजपाचा दारूण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचीच परिणाम म्हणून पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल. ज्याप्रमाणे अटलबिहारी वाजपेयींचे सरकार १३ महिन्यात गेले होते त्याचीच पुनरावृत्ती होताना मला दिसतेय असं विधान त्यांनी केले. 

तर महाविकास आघाडीत जे एकमत आहे, समन्वय आहे, मैत्रीपूर्ण वातावरणात आमची चर्चा सुरू आहे पण त्याविरोधात महायुतीतील धुसफूस सुरू आहे. एका मित्रपक्षाला काढून टाकायचे का? त्याच्यामुळे नुकसान झालं का ही चर्चा उघडपणे पुण्यात सुरू असल्याचं ऐकतोय. महाविकास आघाडीत असं काही वातावरण नाही असं सांगत पृथ्वीराज चव्हाणांनी महायुतीवर निशाणा साधला. 

लवकरच महायुतीत मोठी गडबड शक्य

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा या ठाकरे गटाच्या मागणीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी हाच चेहरा राहणार आहे. बैठकीत आम्ही हे जाहीरपणे सांगितलेले आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदापेक्षा महाराष्ट्र धर्म आणि संस्कृती तसेच महाराष्ट्र वाचवणे हे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही सगळे काम करत आहोत, निवडणुका कधी लागतील, हे सांगता येत नाही. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयात बसतो. महायुतीमध्ये महाभारत चालले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले आहेत. पुढील महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. या निकालाकडून फार अपेक्षा आहेत असं पटोलेंनी सांगितले. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४