शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 14:50 IST

Narendra Modi And Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिममध्ये बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिममध्ये बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "काँग्रेसला फक्त लुटणं माहीत आहे. गरिबांना गरीब ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण काँग्रेसपासून सावध राहा" असं म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे. तसेच "दिल्लीमध्ये हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. दु:खद गोष्ट म्हणजे त्याचा म्होरक्या काँग्रेसचा नेता निघाला. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे" असं सांगत मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. 

"काँग्रेसला फक्त लुटणं माहीत आहे. गरिबांना गरीब ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण काँग्रेसपासून सावध राहा. अर्बन नक्षल काँग्रेसला चालवत आहे. काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहेत. त्यामुळे ते आपल्यात फूट पाडू पाहत आहे. त्यामुळे एक व्हा. ही वेळ एकत्र राहण्याची आहे. आपली एकताच समाजाला वाचवेल. महाराष्ट्रातील लोकांना काँग्रेसचा आणखी एक कारनामा सांगायचा आहे. तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल. दिल्लीमध्ये हजारो कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडलं. दु:खद गोष्ट म्हणजे त्याचा म्होरक्या काँग्रेसचा नेता निघाला."

"काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे. त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत आणि जिंकायच्या आहे. आपल्याला सावध राहायचं आहे. इतरांना सावध करायचं आहे. सोबत मिळून लढायचं आहे. आज नवरात्रीत मला माता जगदंबेच्या मंदिरात त्यांचा आशीर्वाद घेण्याचं सौभाग्य मिळालं. मी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीवर जाऊन त्यांचं आशीर्वाद घेतलं. मी या दोन्ही संतांसमोर नतमस्तक होत आहे."

"आज गोंडवाना राणी दुर्गावतीची जयंती आहे. गेल्यावर्षी त्यांची ५०० वी जयंती साजरी केली होती. मी दुर्गावतीला नमन करतो. हरियाणामध्ये मतदान होत आहे. हरियाणामधील लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं. तुमचं मत हरियाणाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाईल.  २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. पोहरादेवीच्या आशीर्वादाने मला आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मदत देता आली आहे. महाराष्ट्रातील ही योजना नारी शक्तीचे सामर्थ्य वाढवत आहे. देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो. त्यांनी सरकार असताना पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाची योजना आणली होती."

"आमच्या बंजारा समाजाने भारताच्या सामाजिक जीवनात, भारताच्या निर्मितीत मोठी भूमिका बजावली आहेत. कला, संस्कृती, राष्ट्र रक्षा, व्यापारात या समाजाजील महापुरुषांनी सर्व काही केलं आहे. काँग्रेसचे विचार नेहमी विदेशी राहिले आहेत. ते दलित, मागस लोकांना आपलं मानत नाही. त्यांनी बंजारा समाजाविषयी नेहमी दुप्पटी भूमिका घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारने या योजनेला ब्रेक लावला. आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यावर ही योजना सुरू झाली आहे" असंही मोदींनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाwashimवाशिमPoliticsराजकारण