शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

"या सरकारचा जीव खुर्चीत, पण आम्ही त्यांना खुर्चीवरच ठेवणार नाही’’, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 12:56 IST

Manoj Jarange Patil Criticize Mahayuti Government: मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसल्याने सरकारकडून बहाणे बनवण्यात येत आहेत. या सरकारचा जीव हा खुर्चीमध्ये अडकला आहे. मात्र आम्ही त्यांना खुर्चीवरच ठेवणार नाही, असा इशारा, मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

मराठा समाजाला ओबीसींमधून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावं, या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील महायुती सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसल्याने सरकारकडून बहाणे बनवण्यात येत आहेत. या सरकारचा जीव हा खुर्चीमध्ये अडकला आहे. मात्र आम्ही त्यांना खुर्चीवरच ठेवणार नाही, असा इशारा, मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी वीस बावीस दिवसांपूर्वी दौरा सुरू होण्यापूर्वीच सांगितलं होतं की, हे सरकार आरक्षण देईल, याची आता आशाच सोडली पाहिजे. आपल्यालाच लढून आरक्षण मिळवावं लागणार आहे किंवा सत्तेकडे जावं लागणार आहे. एकूण तसं चित्र दिसतंय. गुन्हे मागे घेतो, सरसकट आरक्षण देतोय असं सांगितलं जातंय, आता गुन्हे मागे घेतलेत की नाही माहिती नाही. हैदराबाद संस्थानचं गॅझेट, सातारा संस्थानचं गॅझेट, बॉम्बे गर्व्हर्मेंटचं गॅझेट घेणार म्हणाले होते. पण तेही घेतलं नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करायला यांना आठ आठ महिने लागायला लागले आहेत. यावरून हे दिसतंय की यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे तर मराठ्यांना झुलवत ठेवायचं आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, आता एकदा आचारसंहिता लागली की, आमची सत्ता आल्यावर आरक्षण देतो, अशी भाषा करायची. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, असं यांचं पक्कं ठरलेलं आहे. या सरकारचा खुर्चीमध्ये जीव आहे. त्यामुळे मराठ्यांनी आता पक्कं ठरवलं आहे की, यांना खुर्चीमध्ये ठेवायचं नाही. जे होईल ते होईल, पण खुर्ची यांना ठेवायची नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार