शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफियांच्या घशात, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 18:09 IST

Vijay Wadettiwar Criticize Maharashtra Government: महायुतीचे सरकार हिंदुत्वाचा गाजावाजा करत आहे. परंतु महायुती सरकारने राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफीयांच्या घशात घातल्या आहेत, यावरून महायुती सरकारचे हिंदुत्व, बेगडी असल्याचे सिध्द होत आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई - महायुतीचे सरकार हिंदुत्वाचा गाजावाजा करत आहे. परंतु महायुती सरकारने राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफीयांच्या घशात घातल्या आहेत. सरकारला पाठिंबा दिलेले लोकप्रतिनिधी या देवस्थान जमिन घोटाळ्यात सामिल आहेत. सरकार अशा घोटाळेबाजांना पाठीशी घालत आहे. देवस्थान जमिनींचे प्रश्न सोडवताना सरकार भूमाफीयांचे हितसंबंध जोपासत आहे. यावरून महायुती सरकारचे हिंदुत्व, बेगडी असल्याचे सिध्द होत आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनाला जाण्याआधी सरकारने देवस्थान जमिनी भूमाफीयांच्या  विळख्यातून मुक्त कराव्यात, आजपर्यंत किती देवस्थानच्या जमिनी संबंधित देवस्थानला परत मिळवून दिल्या याबाबतचा लेखाजोखा सरकारने मांडावा,अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

श्री.वडेट्टीवार म्हणाले की, सरकारमधले मंत्री अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत. परंतु दिव्याखाली अंधार अशी सरकारची अवस्था आहे. एकीकडे हिंदुत्वाचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे मात्र देवस्थानच्या जमिनी गिळणाऱ्यांना अभय द्यायचे, असे सरकारचे दुटप्पी धोरण आहे. ज्या सरकारला हिंदूंच्या देवस्थानच्या जमिनींचे संरक्षण करता येत नाही त्या सरकारने हिंदुत्वाच्या गप्पा मारू नयेत, असे खडे बोल श्री. वडेट्टीवार यांनी सरकारला सुनवाले आहेत.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ज्या दानशूर व्यक्तींनी आपल्या जमिनी देवस्थानला दिल्या त्यांची नोंद तहसिल कार्यालयात असते. याबाबतचा आढावा महसूलमंत्री, अपरमुख्य सचिव (महसूल), विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसचे मंत्रालयातील सहसचिव, उपसचिव यांनी घेतला पाहिजे. परंतु सनदी अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक राहिला नसल्याने असा कोणताही आढावा घेतला जात नाही. उदात्त हेतूने दानशूर व्यक्तींनी देवस्थानला जमिनी दिल्या परंतु या जमिनींचे बेकायदा हस्तांतरण होत असताना सरकार मात्र डोळे झाकून बसले आहे. देवस्थान जमिनींबाबतच्या शासन निर्णयाची राज्य शासन अंमलबजावणी करताना दिसत नाही. त्यामुळे या सरकारला हिंदुत्वाचा गाजावाजा करण्याचा अधिकार नाही, अशी खरमरीत टीका श्री. वडेट्टीवार यांनी सरकारवर केली. 

बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळा राज्यभर गाजला आहे. महायुती सरकारने त्यास अभय दिले आहे. सध्या अमरावती जिल्ह्यातील वडाळी येथील महादेव संस्थानचा जमिन घोटाळा गाजत आहे. देवस्थान जमिनीची गैरमार्गाने विक्री परवानगी घेतली आहे. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी ही जमीन भूमाफियाच्या घशात घातली आहे. यामुळे धार्मिक संस्थानाचे विश्वस्त, भाविक यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. नोव्हेंबर महिन्यात आम्ही शासनाला याबाबतचे पत्र दिले आहे. तरी देखील कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या सरकारचे हिंदुत्व, बेगडी असल्याचा हा पुरावा आहे. अशा शब्दात श्री. वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारले आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार