शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
3
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
4
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
5
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
6
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
7
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
8
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
9
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
10
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
11
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
12
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
13
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
14
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
15
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
16
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
17
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
18
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
19
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
20
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव

पालकमंत्र्यांची वाहतूककोंडी! उलट्या दिशेने ताफा घुसला, सव्वाआठ तासांनी बैठकीला पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:22 IST

विरारनंतर पालकमंत्र्यांना जिल्हा नियोजनच्या बैठकीत उपस्थित राहावे लागणार असल्याने पोलिसांनी त्यांना उलट्या दिशेने प्रवास करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडीचा जाच रोजचाच आहे. या महामार्गावर झालेले ५०० निरपराध मृत्यू आणि दररोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेले लोक एक दिवस रस्त्यावर उतरतील, अशी भीती पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली. आज मी वाहतूककोंडीत सापडलो असताना तो संताप मी नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहिला. त्यामुळे लोकांचा उद्रेक झाल्यास अनेक गोष्टी बेचिराख होतील, असेही ते म्हणाले.

पालकमंत्र्यांविरोधात समाजमाध्यमांवर नाराजीविरारनंतर पालकमंत्र्यांना जिल्हा नियोजनच्या बैठकीत उपस्थित राहावे लागणार असल्याने पोलिसांनी त्यांना उलट्या दिशेने प्रवास करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. परंतु, मुंबईकडे सुरळीत सुरू असणारी वाहतूक सेवा पुन्हा ठप्प झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया देत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

सव्वाआठ तासांनी बैठकीला पोहोचलेपालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यासाठी  घरातून पहाटे सहा वाजता निघालेले पालकमंत्री गणेश नाईक हे घोडबंदर ते वसईदरम्यान  वाहतूककोंडीत सापडले. अखेर विरार ते सफाळे असा रोरो जलवाहतूक सेवेचा आधार घेत ते ८:१५ तासांनी बैठकीला पोहोचले. अशाप्रकारे पालघरवासीयांच्या वेदनांच्या झळा पालकमंत्र्यांना भोगाव्या लागल्या.

व्हीसीद्वारे चर्चा करून व्यक्त केली नाराजीमहामार्गावरील वाहतूक पोलिस विभागाच्या पोलिस अधीक्षक आणि मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाचे पोलिस उपायुक्तांशी व्हीसीद्वारे चर्चा करून नाईक यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या महामार्गावर आजपर्यंत सुमारे ५०० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, या वाहतूककोंडीमुळे एखादे लहान मूल आणि महिलेचा उपचारांअभावी होणारा मृत्यू हा महाराष्ट्राला शोभनीय नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शाळकरी विद्यार्थ्यांचे हालमुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुककोंडीचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांनाही सोसावा लागला. मंगळवारी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या १० ते १२ बसेस वाहतूककोंडीत अडकून पडल्या. यात काही दादर येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.  दरम्यान, याप्रकरणी पालकमंत्र्यांनी वाहतुककोंडीचा स्वतः अनुभव घेतल्यानतंर बुधवारी विविध बैठकांमध्ये राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Minister stuck in traffic, enters wrong way, late to meeting.

Web Summary : Minister Naik faced traffic gridlock on Mumbai-Ahmedabad highway, echoing citizen's daily plight. He warns of public anger due to constant delays and fatalities. Arrived 8 hours late for a meeting after using a ferry, then criticized traffic police.
टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकTrafficवाहतूक कोंडी