शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आदित्य ठाकरेंनी म्हटले म्हणून सरकार पडणार नाही, 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देणार; विधानसभा अध्यक्षांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 23:31 IST

नियमांच्या आधारे सुनावणी घेत असून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या कालावधीत सुनावणी पूर्ण होईल पण काय होईल ते आज सांगू शकणार नाही - राहुल नार्वेकर

सावंतवाडी :  नियमांच्या आधारे सुनावणी घेत असून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या कालावधीत सुनावणी पूर्ण होईल पण काय होईल ते आज सांगू शकणार नाही सरकारे ही बहुमताने ठरतात बहुमत नसेल तर ती कोसळतात त्यामुळे सरकार कधी कोसळणार हे आदित्य ठाकरे ठरवू शकत नाही, असा टोला विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांनी ठाकरे यांना लगावला.

31 डिसेंबर पर्यत ठाकरे गट व शिंदे गट यांच्यातील सुनावणी पूर्ण करणार असल्याचेही अॅड.नार्वेकर यांनी स्पष्ट केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अध्यक्ष अॅड.नार्वेकर यांचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी स्वागत केले.यावेळी प्रांताधिकार प्रशांत पानवेकर,तहसिलदार श्रीधर पाटील,लखमसावंत भोसले आदि उपस्थित होते.

अँड ‌ नार्वेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असायला हवी. त्यासाठी विधीमंडळाच्या माध्यमातून शक्यतो प्रयत्न केला जाईल कोकणातील मुंबई ते गोवा आणि रेडी ते रेवस दोन रस्ते पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचे आहेत. 

आदित्य ठाकरे यांनी सरकार ३१ डिसेंबर ला कोसळणार आहे असे म्हटले होते याकडे लक्ष वेधले असता अँड राहुल नार्वेकर म्हणाले, सरकार पडते किंवा टिकते यासाठी सभागृहातील संख्याबळावर अवलंबून असते.आज संविधान दिवस आहे. संविधानात याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सभागृहातील संख्याबळावर, बहुमत महत्त्वाचे ठरते. आदित्य ठाकरे म्हणणार त्यावर ठरत नसते विधानसभा अध्यक्ष याबाबत कायदेशीर योग्य निर्णय देतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लवकरच निर्णय घेतला जाणार असे ही त्यांनी सांगितले.

कोकण किंवा सावंतवाडी मधील अनेक विकासात्मक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मी पुढाकार घेईन  कोकणाला ७२० किलोमीटरचा अथांग समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या माध्यमातून विकास साधला पाहिजे त्यासाठी शासनाने आराखडा तयार केला आहे तसेच मुंबई व कोकणातील सीआरझेड नियम शिथिल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोकणात इको सेन्सिटिव्ह झोन विकासाला अडथळा ठरत आहे त्यामुळे सागरी किनारा पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. तसेच ज्या कंपन्यांनी प्रकल्पासाठी जमीन संपादन केली आहे त्यांनी प्रकल्प सुरू केला नसेल तर ती जमीन पुन्हा शेतकऱ्यांना देता येईल ते जिल्हाधिकारी तपासून निर्णय घेतील असेही नार्वेकर यांनी  सांगितले.

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षEknath Shindeएकनाथ शिंदेAditya Thackreyआदित्य ठाकरे