शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:17 IST

Vijay Wadettiwar News: सरकार आणि त्यांचे मंत्री वारंवार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी भाषा करत असले तरी सत्य मात्र वेगळं आहे. अनेक ठिकाणी तर मंत्र्यांपासून संत्र्यानी ओबीसी प्रमाणपत्र मिळावल्याची चर्चा सुरू आहे. आता जर धनाढ्य मंत्र्यांनी पण ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली तर सामान्य ओबीसींच्या अधिकाराला हा धक्का नाही का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

नागपूर - लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या ३५ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याचे वृत्त आहे. हे वृत्त धक्कादायक आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहे की, सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही. पण हाच सरकारचा विश्वासघात आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर मध्ये आधी पात्र हा शब्द होता आणि अवघ्या काही तासात दुसरा जीआर काढून त्यातून पात्र हा शब्द वगळण्यात आला. इथेच ओबीसी समाजाचा घात सरकारने केला. सरकार आणि त्यांचे मंत्री वारंवार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी भाषा करत असले तरी सत्य मात्र वेगळं आहे. आणि हे आता जनतेला कळले आहे यातूनच निराशा येत आहे. अनेक ठिकाणी तर मंत्र्यांपासून संत्र्यानी ओबीसी प्रमाणपत्र मिळावल्याची चर्चा सुरू आहे. आता जर धनाढ्य मंत्र्यांनी पण ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली तर सामान्य ओबीसींच्या अधिकाराला हा धक्का नाही का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

लातूर इथे ऐन उमेदीतील तरुण भरत कराड याची आत्महत्या ही सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. सरकारच्या शासन निर्णयामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे. यामुळे ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी वाढणार असून मराठवाड्यात तर एकतर्फी मराठा समाज ओबीसी आरक्षणात प्रवेश करण्याचा धोका आहे. लातूर येथील तरुणाची आत्महत्या हे तेच दर्शवत आहे, अस वडेट्टीवार म्हणाले. मराठवाड्यातील तरुणाने टोकाचे पाऊल उचल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का? ज्या शासन निर्णयाने ओबीसी समाजाचे नुकसान होईल. त्या शासन निर्णयाला स्थगिती दिली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

लातूर येथील भरत कराड याची ही आत्महत्या नाही तर सरकारने विश्वासघात केल्याने त्याचा जीव गेला आहे, त्यामुळे याची जबाबदारी महायुती सरकारला घ्यावी लागणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे,त्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी या सरकारने दोन समाजात भांडण लावले आहे. लोकांच्या मनात द्वेष पसरवला आहे.

महायुती सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी , कंत्राटदार आणि आता ओबीसी समाजातील तरुण आत्महत्या करत आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याआधी सरकारने तातडीने यातून मार्ग काढावा आणि जीआर मागे घ्यावा. राज्यातील ओबीसी समाजातील तरुणांना आवाहन आहे की त्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी एकीकडे न्यायालयीन लढाई तर दुसरीकडे शासन पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे त्यामुळे आपल्या हक्कासाठी आपल्याला एकत्र लढायच आहे यात कोणीही जीवावर बेतेल अस कृत्य करू नये, अस आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार