शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची तोंडे समोर हवीत; महायुतीच्या मेळाव्यात चुकांची दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 12:44 IST

निवडणुकीत महायुतीचा एकच गमछा ठेवून त्यावर तिन्ही पक्षांचे चिन्ह ठेवा असाही सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रमुख नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असू नयेत, त्यांची तोंडे एकमेकांसमोर असायला हवीत, असा सल्ला माजी खासदार कपिल पाटील यांनी बुधवारी महायुतीच्या बैठकीत दिला. राज्यातील सरकारला सव्वादोन वर्षे झाली, तरीसुद्धा लोकांना महायुतीचे सरकार का हवे, हे सांगावे लागत आहे, हे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.

मायक्रो लेव्हलला लोकांचे महायुतीवरील प्रेम कमी झाले आहे. आपल्या हातून घडलेल्या चुकांचा हा परिणाम आहे. महायुतीला काठावरील नव्हे घवघवीत यश हवे असल्याने त्यासाठी एकजूट हवी, असा सल्ला आमदार गणेश नाईक यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्याच पुन्हा न करता एकमेकांशी समन्वय साधून काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

ठाण्यात बुधवारी सकाळी महायुतीचा समन्वय मेळावा पार पडला. त्याला प्रमुख मार्गदर्शक, तसेच कोकण विभागाचे समन्वयक उद्योगमंत्री उदय सामंत, प्रसाद लाड, आमदार गणेश नाईक, अनिकेत तटकरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार कपिल पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेत ठाणे, पालघर, कल्याण या तीन जागा निवडून आल्या, परंतु भिवंडीची जागा पडली. विधानसभा निवडणुकीत अशा चुका होता कामा नये, असा सल्ला खासदार नरेश म्हस्के यांनी दिला.

२४ ऑगस्टपासून प्रचारयात्रा : लाड

महायुतीच्या माध्यमातून येत्या २४ ऑगस्टपासून प्रचार यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती लाड यांनी दिली. ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून, पालघर नवी मुंबई अशी ही यात्रा जाईल. ‘एकजूट महाराष्ट्रासाठी, अभियान विकासासाठी, कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडिया आर्मी तयार करून त्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हला उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचा स्ट्राइक रेट ८५ टक्के : सामंत

लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह लोकापर्यंत पोहोचविण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली होती, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. कोकणात ७४ जागा असून, त्या सर्व महायुती लढणार आहे. महायुतीचा स्ट्राइक रेट ८५ टक्क्यांपेक्षा पुढे असेल, असा दावा त्यांनी केला.

महायुतीचा एकच गमछा

निवडणुकीत महायुतीमधील प्रत्येक पक्ष वेगवेगळा गमछा घालून प्रचार करीत असतात. त्यातून काही वेळेस नेत्यांमध्ये भांडणे होतात. महायुतीचा एकच गमछा ठेवा आणि त्यावर तिन्ही पक्षांचे चिन्ह ठेवा, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस