शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची तोंडे समोर हवीत; महायुतीच्या मेळाव्यात चुकांची दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 12:44 IST

निवडणुकीत महायुतीचा एकच गमछा ठेवून त्यावर तिन्ही पक्षांचे चिन्ह ठेवा असाही सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रमुख नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असू नयेत, त्यांची तोंडे एकमेकांसमोर असायला हवीत, असा सल्ला माजी खासदार कपिल पाटील यांनी बुधवारी महायुतीच्या बैठकीत दिला. राज्यातील सरकारला सव्वादोन वर्षे झाली, तरीसुद्धा लोकांना महायुतीचे सरकार का हवे, हे सांगावे लागत आहे, हे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.

मायक्रो लेव्हलला लोकांचे महायुतीवरील प्रेम कमी झाले आहे. आपल्या हातून घडलेल्या चुकांचा हा परिणाम आहे. महायुतीला काठावरील नव्हे घवघवीत यश हवे असल्याने त्यासाठी एकजूट हवी, असा सल्ला आमदार गणेश नाईक यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्याच पुन्हा न करता एकमेकांशी समन्वय साधून काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

ठाण्यात बुधवारी सकाळी महायुतीचा समन्वय मेळावा पार पडला. त्याला प्रमुख मार्गदर्शक, तसेच कोकण विभागाचे समन्वयक उद्योगमंत्री उदय सामंत, प्रसाद लाड, आमदार गणेश नाईक, अनिकेत तटकरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार कपिल पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेत ठाणे, पालघर, कल्याण या तीन जागा निवडून आल्या, परंतु भिवंडीची जागा पडली. विधानसभा निवडणुकीत अशा चुका होता कामा नये, असा सल्ला खासदार नरेश म्हस्के यांनी दिला.

२४ ऑगस्टपासून प्रचारयात्रा : लाड

महायुतीच्या माध्यमातून येत्या २४ ऑगस्टपासून प्रचार यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती लाड यांनी दिली. ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून, पालघर नवी मुंबई अशी ही यात्रा जाईल. ‘एकजूट महाराष्ट्रासाठी, अभियान विकासासाठी, कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडिया आर्मी तयार करून त्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हला उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचा स्ट्राइक रेट ८५ टक्के : सामंत

लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह लोकापर्यंत पोहोचविण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली होती, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. कोकणात ७४ जागा असून, त्या सर्व महायुती लढणार आहे. महायुतीचा स्ट्राइक रेट ८५ टक्क्यांपेक्षा पुढे असेल, असा दावा त्यांनी केला.

महायुतीचा एकच गमछा

निवडणुकीत महायुतीमधील प्रत्येक पक्ष वेगवेगळा गमछा घालून प्रचार करीत असतात. त्यातून काही वेळेस नेत्यांमध्ये भांडणे होतात. महायुतीचा एकच गमछा ठेवा आणि त्यावर तिन्ही पक्षांचे चिन्ह ठेवा, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस