शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

सर्वपक्षीय बैठकीनंतरच घेणार भोंग्यांबाबत निर्णय; राज ठाकरे यांनाही बोलावणार - गृहमंत्री वळसे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 06:14 IST

वळसे पाटील यांनी सांगितले की,  राज्यात भोंग्यांचा जो  प्रश्न निर्माण झाला आहे, त्याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना आढावा बैठक घ्यायला सांगितली होती.

मुंबई :  धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. या बैठकीला मनसे अध्यक्ष  राज ठाकरेंनाही बोलविले जाईल, असेही ते म्हणाले. 

वळसे पाटील यांनी सांगितले की,  राज्यात भोंग्यांचा जो  प्रश्न निर्माण झाला आहे, त्याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना आढावा बैठक घ्यायला सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी मंगळवारी बैठक घेतली व बैठकीचा अहवाल माझ्याकडे दिला आहे. येत्या काही दिवसांत राज्यात जी परिस्थिती उपस्थित होऊ शकते, त्याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काय तयारी केली आहे, याबाबतच अहवालही त्यांनी दिला आहे.

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा नवीन नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सन २००५ मध्येच निकाल दिलेला होता. त्यावर आधारित दोन शासन निर्णय अनुक्रमे २०१५ आणि २०१७ मध्ये काढण्यात आले होते. त्यात अशा प्रकारचे भोंगे लावण्यासाठी परवानगीची पद्धत ठरवून दिली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. संघर्ष वाढवू नका, तेढ निर्माण करू नका. तरीही कुणाकडून तशी कृती झाली तर त्याबाबत कठोर कारवाई केली जाईल.     - दिलीप वळसे पाटील 

जबाबदारी पोलिसांची-  भोंगे लावणे, उतरवणे ही सरकारची जबाबदारी नाही. पोलिसांची परवानगी घेऊनच ते लावायला हवेत. -  ज्यांना तशी परवानगी नाही, त्यांना हे लावता येणार नाहीत. -  जे लावतील, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार ते लावावेत. -  सरकारने कुठला भोंगा काढायचा किंवा लावायचा, असा प्रश्नच उद्भवत नसल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसे