शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सर्वपक्षीय बैठकीनंतरच घेणार भोंग्यांबाबत निर्णय; राज ठाकरे यांनाही बोलावणार - गृहमंत्री वळसे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 06:14 IST

वळसे पाटील यांनी सांगितले की,  राज्यात भोंग्यांचा जो  प्रश्न निर्माण झाला आहे, त्याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना आढावा बैठक घ्यायला सांगितली होती.

मुंबई :  धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. या बैठकीला मनसे अध्यक्ष  राज ठाकरेंनाही बोलविले जाईल, असेही ते म्हणाले. 

वळसे पाटील यांनी सांगितले की,  राज्यात भोंग्यांचा जो  प्रश्न निर्माण झाला आहे, त्याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना आढावा बैठक घ्यायला सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी मंगळवारी बैठक घेतली व बैठकीचा अहवाल माझ्याकडे दिला आहे. येत्या काही दिवसांत राज्यात जी परिस्थिती उपस्थित होऊ शकते, त्याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काय तयारी केली आहे, याबाबतच अहवालही त्यांनी दिला आहे.

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा नवीन नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सन २००५ मध्येच निकाल दिलेला होता. त्यावर आधारित दोन शासन निर्णय अनुक्रमे २०१५ आणि २०१७ मध्ये काढण्यात आले होते. त्यात अशा प्रकारचे भोंगे लावण्यासाठी परवानगीची पद्धत ठरवून दिली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. संघर्ष वाढवू नका, तेढ निर्माण करू नका. तरीही कुणाकडून तशी कृती झाली तर त्याबाबत कठोर कारवाई केली जाईल.     - दिलीप वळसे पाटील 

जबाबदारी पोलिसांची-  भोंगे लावणे, उतरवणे ही सरकारची जबाबदारी नाही. पोलिसांची परवानगी घेऊनच ते लावायला हवेत. -  ज्यांना तशी परवानगी नाही, त्यांना हे लावता येणार नाहीत. -  जे लावतील, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार ते लावावेत. -  सरकारने कुठला भोंगा काढायचा किंवा लावायचा, असा प्रश्नच उद्भवत नसल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसे