शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

आज उदास उदास, दूर...; ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली नाही, तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 07:19 IST

पळसखेड्याची गाणी हयातभर गाणाऱ्या महानोरांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी त्यांच्या मूळगावी पळसखेडे (जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  

घेऊन... रानात गुंतलेले प्राण अवचित रानामध्येच हरपावेत तसे मराठी कवितेतले हिरव्या बोलीचे शब्द अचानक अबोल झाले. निसर्गावर भरभरून प्रेम करणारा, काळ्या मातीच्याच शब्दगंधात बेहोषून जाणारा रानकवी दिगंताच्या प्रवासाला निघून गेला. कविवर्य ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली असं नाही तर रानारानातून बहरलेला हिरवा निसर्गच आतून आतून गलबलून गेला. पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात वयाच्या ८० व्या वर्षी महानोरांनी अखेरचा श्वास घेतला. पळसखेड्याची गाणी हयातभर गाणाऱ्या महानोरांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी त्यांच्या मूळगावी पळसखेडे (जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  

शेतकऱ्यांचे सुखदुःख शब्दाशब्दांतून पेरणाऱ्या महानोरांच्या रानातल्या कविता लोकलयीतून आलेल्या आणि त्यामुळेच सर्वसामान्य रसिकांच्या ओठांवर सहजपणे रेंगाळणाऱ्या... कधी त्या पावसाळी कविता म्हणून भेटतात तर कधी वही बनून निसर्गाची विविध रूपं मोरपिसासारख्या हृदयाच्या खोल कप्प्यातून फुलारत राहतात. कधी आकाशीचे पक्ष्यांचे लक्ष थवे पाहत दयाघनाला प्रार्थना करतात, तर कधी पानझडीचे शल्य मांडताना तिची कहाणी सांगत राहतात. लोकसंस्कृतीचा निखळ प्रवाह महानोरांच्या कवितांमधून वाहत राहिला आणि त्यात मराठी रसिकमन आबादानी होत राहिले. पण, सहजसुंदर या कवितांचा अचानक थांबलेला हा प्रवास रसिकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. महानोरांच्या शब्दांत सांगायचे तर...  

रसिकांचे उदास झालेले मन जणू काही महानोरांच्या याच ओळी आठवत असेल... दूरच्या रानाला लागीर उन्हालापारंबीचा झुला गेला झुलत नभाला...आज उदास उदास दूर पांगल्या सावल्याएकान्ताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्याकाही केल्या करमेना, कसा जीवच लागेनाबोलघेवडी साळुंकी आज शब्दही बोलेना.... 

शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांचा आवाजजोंधळ्याला चांदणे लगडून यावे, असे म्हणणारे महानोर निव्वळ कवीच नव्हते तर हाडामांसाचे शेतकरी होते. म्हणूनच तर शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांचा आवाज त्यांनी जसा रसिकांच्या दरबारात पोहोचवला तसाच तो शासनदरबारीही पोहोचवला. दोन वेळा विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. 

हे खेडे अंधाराचे, हे खेडे प्रकाशाचे जन्मोजन्मी लक्तरलेले, दुःख घेऊन चालत आले... असे म्हणत त्यांनी खेड्यापाड्यांतील शेतकऱ्यांचे वास्तव सातत्याने मांडले. महानोरांना या शेतानेच असा काही लळा लावला की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो म्हणत त्यांचा जीवच जखडला आणि रानाच्या हिरव्या बोलीचा शब्द होऊन गेला. या हिरव्या बोलीनेच मराठी रसिकांच्या काव्यजाणिवा साठोत्तरी काळात प्रगल्भ होत गेल्या. आज ही बोली शांतावली असली तरी अक्षरे चुरगाळून अमृताचे कुंभ प्यायलेली महानोरांची कविता रसिकांच्या सोबत असेल. 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणेAurangabadऔरंगाबादMarathi Songsमराठी गाणी