शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

आज उदास उदास, दूर...; ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली नाही, तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 07:19 IST

पळसखेड्याची गाणी हयातभर गाणाऱ्या महानोरांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी त्यांच्या मूळगावी पळसखेडे (जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  

घेऊन... रानात गुंतलेले प्राण अवचित रानामध्येच हरपावेत तसे मराठी कवितेतले हिरव्या बोलीचे शब्द अचानक अबोल झाले. निसर्गावर भरभरून प्रेम करणारा, काळ्या मातीच्याच शब्दगंधात बेहोषून जाणारा रानकवी दिगंताच्या प्रवासाला निघून गेला. कविवर्य ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली असं नाही तर रानारानातून बहरलेला हिरवा निसर्गच आतून आतून गलबलून गेला. पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात वयाच्या ८० व्या वर्षी महानोरांनी अखेरचा श्वास घेतला. पळसखेड्याची गाणी हयातभर गाणाऱ्या महानोरांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी त्यांच्या मूळगावी पळसखेडे (जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  

शेतकऱ्यांचे सुखदुःख शब्दाशब्दांतून पेरणाऱ्या महानोरांच्या रानातल्या कविता लोकलयीतून आलेल्या आणि त्यामुळेच सर्वसामान्य रसिकांच्या ओठांवर सहजपणे रेंगाळणाऱ्या... कधी त्या पावसाळी कविता म्हणून भेटतात तर कधी वही बनून निसर्गाची विविध रूपं मोरपिसासारख्या हृदयाच्या खोल कप्प्यातून फुलारत राहतात. कधी आकाशीचे पक्ष्यांचे लक्ष थवे पाहत दयाघनाला प्रार्थना करतात, तर कधी पानझडीचे शल्य मांडताना तिची कहाणी सांगत राहतात. लोकसंस्कृतीचा निखळ प्रवाह महानोरांच्या कवितांमधून वाहत राहिला आणि त्यात मराठी रसिकमन आबादानी होत राहिले. पण, सहजसुंदर या कवितांचा अचानक थांबलेला हा प्रवास रसिकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. महानोरांच्या शब्दांत सांगायचे तर...  

रसिकांचे उदास झालेले मन जणू काही महानोरांच्या याच ओळी आठवत असेल... दूरच्या रानाला लागीर उन्हालापारंबीचा झुला गेला झुलत नभाला...आज उदास उदास दूर पांगल्या सावल्याएकान्ताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्याकाही केल्या करमेना, कसा जीवच लागेनाबोलघेवडी साळुंकी आज शब्दही बोलेना.... 

शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांचा आवाजजोंधळ्याला चांदणे लगडून यावे, असे म्हणणारे महानोर निव्वळ कवीच नव्हते तर हाडामांसाचे शेतकरी होते. म्हणूनच तर शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांचा आवाज त्यांनी जसा रसिकांच्या दरबारात पोहोचवला तसाच तो शासनदरबारीही पोहोचवला. दोन वेळा विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. 

हे खेडे अंधाराचे, हे खेडे प्रकाशाचे जन्मोजन्मी लक्तरलेले, दुःख घेऊन चालत आले... असे म्हणत त्यांनी खेड्यापाड्यांतील शेतकऱ्यांचे वास्तव सातत्याने मांडले. महानोरांना या शेतानेच असा काही लळा लावला की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो म्हणत त्यांचा जीवच जखडला आणि रानाच्या हिरव्या बोलीचा शब्द होऊन गेला. या हिरव्या बोलीनेच मराठी रसिकांच्या काव्यजाणिवा साठोत्तरी काळात प्रगल्भ होत गेल्या. आज ही बोली शांतावली असली तरी अक्षरे चुरगाळून अमृताचे कुंभ प्यायलेली महानोरांची कविता रसिकांच्या सोबत असेल. 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणेAurangabadऔरंगाबादMarathi Songsमराठी गाणी