शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ केलं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 20:19 IST

'राष्ट्रवादीच्या नेत्यांना पन्नास-शंभर कोटी निधी मिळायचा आणि आपल्या नेत्यांना दहा-पाच कोटी दिले जायचे. शिवसेनेत आमच्यापैकी अनेकांचे खच्चीकरण केले, संपवण्याचा प्रयत्न केला.'

सिल्लोड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बडंखोरी केल्यापासून ठाकरे गटातील नेते त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. तसेच, शिंदे गटाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, गेल्या काही काळात घडलेल्या सर्व घटनांवर भाष्य केले. 

सेनेत अनेकांचे खच्चीकरण झाले'शिंदे पुढे म्हणाले की, 'ही आताची लढाई सोपी नव्हती. लोकं सत्तेत येण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही सत्तेतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना पन्नास-शंभर कोटी निधी मिळायचा आणि आपल्या नेत्यांना दहा-पाच कोटी दिले जायचे. त्यांना सुरक्षा मिळायची आणि आपले खच्चीकरण व्हायचे. इथे रामदासभाई कदम आहेत, त्यांचे किती खच्चीकरण केले, हे साऱ्या जनतेने पाहिले आहे. त्यांचे मतभेद असतील, पण त्यांच्या मुलाने काय केले? आमदार योगेश कदम यांचे किती खच्चीकरण केले. त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. ज्या माणसांनी बाळासाहेबांसोबत काम केले, त्या माणसांची तुम्ही काय अवस्था केली?' असा सवालही शिंदे यांनी यावेळी केला.

'आम्ही गद्दारी केली असती तर...'ते पुढे म्हणणतात की, 'आम्ही गद्दारी केली असती, सत्तापिपासू असतो, बंडखोरी केली असती, तर इतकी लोक आमच्यासोबत आले नसते. मी जिकडे जातोय, तिकडे लाखो लोक येतायेत, ही जनता आमच्या पाठिशी आली नसती. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कधी जवळ केलं नाही, त्यांच्या शब्दाला तुम्ही तिलांजली दिली. आम्ही हिंदुत्वाचे विचार पुढे नेत आहोत. जी लोक सावरकरांवर बोलायची, त्यांच्याविरोधात एकही शब्द आम्हाला काढता यायचा नाही. ज्यांचे दाऊदसोबत कनेक्शन आहे, त्यांच्याविरोधात आम्ही बोलू शकत नव्हतो. मग बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार पुढे कसे नेणार. बाळासाहेबांनी आम्हाला अन्यायाविरोधात लढायला शिकवलं आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी यावेळी दिली. 

'आघाडी करू नका असं आम्ही म्हणालो होतो'ते पुढे म्हणाले की, 'मी साक्षीदार आहे, शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडून आलो होतो. मी तेव्हा उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो शोधण्याची इच्छाशक्ती असावी लागते. पण, तसं झालं नाही. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली. तेव्हा आम्ही सगळे म्हणालो होतो, ही अशी आघाडी करू नका. पण, पक्षाचा आदेश ऐकायचा असतो, बाळासाहेबांची शिकवण आहे. नंतर आघाडी सरकार स्थापन झालं,' अशी माहिती शिंदेंनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद