शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आरोपीला एवढं कडक शासन व्हावं की...; बदलापूर प्रकरणावर अजित पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 14:14 IST

त्याचार प्रकरणातील नराधमांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

NCP Ajit Pawar ( Marathi News ) :बदलापूर पूर्व येथील एका शाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरत आंदोलन छेडलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "अत्याचार प्रकरणातील नराधमांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे. एवढं कडक शासन व्हायला पाहिजे की पुन्हा असं करण्याचं त्यांचं धाडसच नाही झालं पाहिजे आणि असं काही करण्याच्या स्थितीतच ते राहिले नाही पाहिजेत," असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, "बलात्कार प्रकरणातील कायदा केंद्र सरकारने करणं आवश्यक असतं. कारण मागे महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आम्ही शक्ती कायद्यासाठी प्रयत्न केला होता. शेजारच्या राज्यात जिथं हा कायदा बनवण्यात आला आहे, तिथंही आम्ही लोकांना पाठवलं होतं," असं अजित पवार म्हणाले. तसंच "काही लोकं म्हणतात की, मुलींनी रात्री उशिरा घराबाहेर पडू नये. मात्र मी याच्याशी अजिबात सहमत नाही. मुलांनी घराबाहेर पडलेलं चालतं, पण मुलींनीच का जाऊ नये? जो नियम मुलांना लावला जातो, तोच मुलींनाही लावला गेला पाहिजे. मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा," असं आवाहन त्यांनी केलं आहे. 

"बदलापूरची घटना घडल्यानंतर लगेचच मी तिथल्या पोलीस आयुक्तांसोबत फोनवर बोललो होतो. कोणताही हस्तक्षेप न होऊ देता आरोपीवर कडक कारवाई व्हायला हवी, असं मी त्यांना सांगितलं होतं. या प्रकरणाची फास्टट्रॅकवर सुनावणी व्हायला हवी. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबतची माहिती दिली आहे," अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल आणि यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbadlapurबदलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ