शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:31 IST

Sanjay Raut News: मंत्रिमंडळात गोंधळाचे वातावरण असून, नियंत्रणाबाहेर स्थिती गेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते, असा दावा संजय राऊतांनी केला.

Sanjay Raut News: झारखंडमधील दारू घोटाळ्यात सुमित फॅसिलीटीचे संचालक अमित साळुंखे यांना लाचलुचपत पथकाने रांचीमध्ये अटक केली आहे. अमित साळुंखे छत्तीसगडमधील मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियाचा निकटवर्तीय आहे. सिंघानियांच्या चौकशीतून अमित साळुंखेवर एसीबीने अटकेची कारवाई केली आहे. याच अमित साळुंखेचा उल्लेख करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळाच्या साफ-सफाईची मोहीम हाती घ्यावीच लागेल. चार मंत्र्यांची नावे घेत संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. 

संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेले परंतु त्यांचा मुख्य हेतू हा मंत्रिमंडळात जे गोंधळाचे वातावरण आहे. त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ते दिल्लीत आले. मंत्रिमंडळातील ४ मंत्री जाणार आहेत, हे मी काही दिवसांपासून सांगत आहे. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम आणि संजय राठोड यांना जावे लागेल. संपूर्ण मंत्रिमंडळाची साफसफाई करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याविषयी दिल्लीत चर्चा आहे. भ्रष्टाचार, शेतकरी विरोधी वक्तव्य, लेडीज बार, घोटाळे, पैशांच्या उघड्या बॅगा घेऊन बसणे, यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे. हे ओझे देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेच्या पलीकडे गेले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे शिंदेकडे वळवले

१०० कोटींचे रुग्णवाहिका निविदा ८०० कोटींपर्यंत गेली, त्या १०८ नंबर रुग्णवाहिकेचे कंत्राट सुमित फॅसिलिटीला दिले होते. त्याचे सूत्रधार अमित साळुंखे आहे. हा वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे. हा अमित साळुंखे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा आर्थिक कणा आहे. मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे शिंदेकडे वळवले. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला दिले याची चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली. झारखंडमधील मद्य घोटाळ्यात अमित साळुंखेला अटक केली. हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत ते शोधायचे आहे. हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत जोडले जात आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला. 

दरम्यान, झारखंडमधून पथक येते आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाणार आहे. ८०० कोटींचा घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकलेत. कुठल्या मेडिकल फाऊंडेशनला हे पैसे गेलेत. निवडणुकीत कसे वापरले गेले. कुठून आले हे सगळे आता बाहेर पडणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम घ्यावी लागेल. मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचे आणि कुणाला काढायचे, वगळायचे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शाह यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळाचा पूर्ण चेहरा बदलून नव्या चेहऱ्याचे मंत्रिमंडळ आणावे अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्तुळात सुरू आहे. खरेतर ज्यांचे १३७ आमदारांचे संख्याबळ आहे त्यांना अशाप्रकारच्या ओझ्याने वाकून जायची गरज नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahayutiमहायुतीShiv Senaशिवसेना