शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

“दबावामुळे INDIA आघाडीतून कोणताही पक्ष बाहेर पडणार नाही”; संजय राऊतांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 12:35 IST

INDIA Meeting In Mumbai: २६ ते २७ देशभक्त पक्ष एकत्र आल्याने भाजपची झोप उडाली आहे. त्यामुळेच ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांवर कारवाया सुरू आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

INDIA Meeting In Mumbai: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या विरोधात उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी येथील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीच्या स्थळी पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. दबावामुळे इंडिया आघाडीतून कोणताही पक्ष बाहेर पडणार नाही, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. इंडिया आघाडीत २६ राजकीय पक्ष सामील आहे. त्यामुळे विरोधकांची आघाडी बळकट होताना दिसत आहे. इंडिया आघाडीतील पक्षांवर दबाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

दबावामुळे INDIA आघाडीतून कोणताही पक्ष बाहेर पडणार नाही

इंडिया आघाडीच्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजीच्या बैठकीच्या तयारीला वेग आलेला आहे. देशातील देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत. भाजपकडून विरोधकांवर कारवाई सुरू आहे. २६ ते २७ देशभक्त पक्ष एकत्र आल्याने भाजपची झोप उडाली असून, त्यामुळेच ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांवर ईडी, सीबीआय कारवाया सुरू आहेत. विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, म्हणून राजकीय विरोधकांवर खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची, असे सत्र सध्या भाजपच्या लोकांनी आरंभलेल आहे. मात्र कुठलाही पक्ष इंडिया आघाडीतून दबावामुळे बाहेर पडणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील ही बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ या नावाने एकत्र येत भाजपच्या नेतृत्वातील एनडीचा मुकाबला करण्याचा निर्धार करत ‘इंडिया जिंकणार, भाजप हरणार!’ असा ऐक्याचा बुलंद नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पाटणा, बंगळुरू येथील दोन बैठकांनंतर ‘इंडिया’ची महत्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीला सात राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्यासह देशभरातील २६ राजकीय पक्षांचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते उपस्थित राहणार आहेत. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी