शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

“भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून भाजपा २०० जागाही जिंकू शकणार नाही”; ठाकरे गटाचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 15:33 IST

Thackeray Group Reaction On Ashok Chavan Joins BJP: अशोक चव्हाणांच्या जाण्याने महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही. भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

Thackeray Group Reaction On Ashok Chavan Joins BJP: काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. तर, अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० जागाही जिंकता येणार नाहीत, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावरून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. काँग्रेसबरोबर थेट युती करणे टाळून भाजपावाले अशा प्रकारे काँग्रेसशी युती करत आहेत. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून ४०० पार उडी मारता येईल असे त्यांना वाटते. परंतु, भाजपा अशा पद्धतीने २०० पार जाणार नाही. कुठे नेऊन ठेवलीय भाजपा माझी? असे विचारायची परिस्थिती आहे. असेच चालत राहिले तर मोदींना देशात तोंड लपवून फिरावे लागेल, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. 

भाजपा राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करत आहे

सगळ्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भाजपा राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करत आहे. भाजपाने काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा आता बदलली पाहिजे. कारण त्यांनी काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच पक्षात घेऊन शुद्धीकरण मोहीम चालवली आहे. महात्मा गांधी यांचे काँग्रेसचे शुद्धीकरण करण्याचे स्वप्न भाजपाने स्वीकारले आहे असे दिसते, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने ज्याप्रमाणे एक एक नेत्याच्या मागे शुक्लकाष्ट लावले आहे, ज्या वेगवेगळ्या चौकशा लावल्या आहेत. त्यामुळे तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी तात्पुरते का होईना भाजपावासी झालेले परवडेल अशी मन:स्थिती सर्वांनी केलेली आहे. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपावर कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये अशोक चव्हाण पुढे होते. पण ते भाजपात गेलेले आहेत. त्यामुळे फरक काही पडणार नाही. आघाडी मजबूतच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा