शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

“भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून भाजपा २०० जागाही जिंकू शकणार नाही”; ठाकरे गटाचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 15:33 IST

Thackeray Group Reaction On Ashok Chavan Joins BJP: अशोक चव्हाणांच्या जाण्याने महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही. भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

Thackeray Group Reaction On Ashok Chavan Joins BJP: काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. तर, अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० जागाही जिंकता येणार नाहीत, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावरून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. काँग्रेसबरोबर थेट युती करणे टाळून भाजपावाले अशा प्रकारे काँग्रेसशी युती करत आहेत. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून ४०० पार उडी मारता येईल असे त्यांना वाटते. परंतु, भाजपा अशा पद्धतीने २०० पार जाणार नाही. कुठे नेऊन ठेवलीय भाजपा माझी? असे विचारायची परिस्थिती आहे. असेच चालत राहिले तर मोदींना देशात तोंड लपवून फिरावे लागेल, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. 

भाजपा राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करत आहे

सगळ्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भाजपा राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करत आहे. भाजपाने काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा आता बदलली पाहिजे. कारण त्यांनी काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच पक्षात घेऊन शुद्धीकरण मोहीम चालवली आहे. महात्मा गांधी यांचे काँग्रेसचे शुद्धीकरण करण्याचे स्वप्न भाजपाने स्वीकारले आहे असे दिसते, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने ज्याप्रमाणे एक एक नेत्याच्या मागे शुक्लकाष्ट लावले आहे, ज्या वेगवेगळ्या चौकशा लावल्या आहेत. त्यामुळे तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी तात्पुरते का होईना भाजपावासी झालेले परवडेल अशी मन:स्थिती सर्वांनी केलेली आहे. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपावर कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये अशोक चव्हाण पुढे होते. पण ते भाजपात गेलेले आहेत. त्यामुळे फरक काही पडणार नाही. आघाडी मजबूतच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा