शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी मी लावले असतील तर...; भास्कर जाधव कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:55 IST

मला ज्या भूमिका घ्यायच्या आहेत ते खुलेआम घेईन. सगळ्यांसमोर घेऊन. मी कुणाला घाबरत नाही. मी परिणामांची चिंता अजिबात करत नाही असं भास्कर जाधव म्हणाले.

मुंबई - जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडाचा पवित्रा घेतला तेव्हा भास्कर जाधव यांनी १०० हून अधिक वेळा शिंदे यांना त्यांच्या गटात सामील करून घेण्यासाठी कॉल केला होता. परंतु आमदारांच्या विरोधामुळे भास्कर जाधव यांना शिंदे गटात घेतले नाही असा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला होता. त्यावरून आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही कडाडून उत्तर दिले आहे. 

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, मी तत्वासाठी लढतो. जर मोहित कंबोज १०० बापांची पैदास नसेल तर त्याने एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. देवेंद्र फडणवीस आता सुरुवातच झाली असेल तुमच्याकडे सत्ता, पैसा, तपास यंत्रणा आहेत. मी तत्त्वासाठी, ध्येयासाठी लढतो. मी सामान्य माणूस आहे त्यामुळे अशी यंत्रणा लावा जर मी एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी लावले असले तरी मी माझ्या राजकीय जीवनातून मुक्त होईन असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत मोहित कंबोजचा बोलवता अनाजीपंत आहे. अनाजीपंतांना सांगतो. तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार संपवायला निघाला परंतु माझ्यासारखे भास्कर जाधव १०० उभे राहतील. तुम्ही १ आरोप सहन करू शकत नाही. मी सामान्य माणूस आहे. मी कुणाच्या दरवाजात राजकारणासाठी उभे राहिलो नाही. मोहित कंबोज, अनाजीपंत यांनी एक आरोप सिद्ध करून दाखवाव असं प्रतिआव्हान भास्कर जाधव यांनी दिले आहे. 

दरम्यान, मी ट्रेनमधून प्रवास करताना फोन लागला नाही. तेव्हा भास्कर जाधव गायब अशा बातम्या झळकल्या. मला ज्या भूमिका घ्यायच्या आहेत ते खुलेआम घेईन. सगळ्यांसमोर घेऊन. मी कुणाला घाबरत नाही. मी परिणामांची चिंता अजिबात करत नाही. भास्कर जाधव कुणाच्या दरवाजात मला तुमच्या दरवाजा मला घ्या म्हणून याचना केली नाही. राजकारण माझे पोट भरण्याचा धंदा नाही. राजकारण माझे समाजसेवेचे साधन आहे. मी धंदे व्यवसाय शेती करून जीवन जगतोय त्यात समाधानी आहे असं भास्कर जाधव यांनी सांगितले. 

...ते वर्मी लागलंयमोहित कंबोजसारख्या माणसाने माझ्यावर आरोप करून माझे राजकीय कारकिर्द डागळली जाते का? अनाजीपंताची डागळली जाईल. अनाजीपंताना लोक दोष देतील. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा काय छळ झाला त्याचा उल्लेख मी सभागृहात केला. संभाजी महाराजांना ज्या अनाजीपंतांनी, मोरोपंतांनी, रावजी पंतांनी, सोमाजी पंतानी हे पंत आजही महाराष्ट्रात आहेत असे मी बोललो ते वर्मी लागलंय अशा शब्दात भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधला.  

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवMohit Kambojमोहित कंबोज भारतीयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे