शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी मी लावले असतील तर...; भास्कर जाधव कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:55 IST

मला ज्या भूमिका घ्यायच्या आहेत ते खुलेआम घेईन. सगळ्यांसमोर घेऊन. मी कुणाला घाबरत नाही. मी परिणामांची चिंता अजिबात करत नाही असं भास्कर जाधव म्हणाले.

मुंबई - जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडाचा पवित्रा घेतला तेव्हा भास्कर जाधव यांनी १०० हून अधिक वेळा शिंदे यांना त्यांच्या गटात सामील करून घेण्यासाठी कॉल केला होता. परंतु आमदारांच्या विरोधामुळे भास्कर जाधव यांना शिंदे गटात घेतले नाही असा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला होता. त्यावरून आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही कडाडून उत्तर दिले आहे. 

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, मी तत्वासाठी लढतो. जर मोहित कंबोज १०० बापांची पैदास नसेल तर त्याने एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. देवेंद्र फडणवीस आता सुरुवातच झाली असेल तुमच्याकडे सत्ता, पैसा, तपास यंत्रणा आहेत. मी तत्त्वासाठी, ध्येयासाठी लढतो. मी सामान्य माणूस आहे त्यामुळे अशी यंत्रणा लावा जर मी एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी लावले असले तरी मी माझ्या राजकीय जीवनातून मुक्त होईन असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत मोहित कंबोजचा बोलवता अनाजीपंत आहे. अनाजीपंतांना सांगतो. तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार संपवायला निघाला परंतु माझ्यासारखे भास्कर जाधव १०० उभे राहतील. तुम्ही १ आरोप सहन करू शकत नाही. मी सामान्य माणूस आहे. मी कुणाच्या दरवाजात राजकारणासाठी उभे राहिलो नाही. मोहित कंबोज, अनाजीपंत यांनी एक आरोप सिद्ध करून दाखवाव असं प्रतिआव्हान भास्कर जाधव यांनी दिले आहे. 

दरम्यान, मी ट्रेनमधून प्रवास करताना फोन लागला नाही. तेव्हा भास्कर जाधव गायब अशा बातम्या झळकल्या. मला ज्या भूमिका घ्यायच्या आहेत ते खुलेआम घेईन. सगळ्यांसमोर घेऊन. मी कुणाला घाबरत नाही. मी परिणामांची चिंता अजिबात करत नाही. भास्कर जाधव कुणाच्या दरवाजात मला तुमच्या दरवाजा मला घ्या म्हणून याचना केली नाही. राजकारण माझे पोट भरण्याचा धंदा नाही. राजकारण माझे समाजसेवेचे साधन आहे. मी धंदे व्यवसाय शेती करून जीवन जगतोय त्यात समाधानी आहे असं भास्कर जाधव यांनी सांगितले. 

...ते वर्मी लागलंयमोहित कंबोजसारख्या माणसाने माझ्यावर आरोप करून माझे राजकीय कारकिर्द डागळली जाते का? अनाजीपंताची डागळली जाईल. अनाजीपंताना लोक दोष देतील. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा काय छळ झाला त्याचा उल्लेख मी सभागृहात केला. संभाजी महाराजांना ज्या अनाजीपंतांनी, मोरोपंतांनी, रावजी पंतांनी, सोमाजी पंतानी हे पंत आजही महाराष्ट्रात आहेत असे मी बोललो ते वर्मी लागलंय अशा शब्दात भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधला.  

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवMohit Kambojमोहित कंबोज भारतीयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे