शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बाळासाहेबांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री खुर्चीवरून खाची खेचण्याचं पाप केलेले...भास्कर जाधवांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:35 IST

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी कोरोना काळात संकटात सापडली होती तेव्हा मोदी मुंबईत आले नाहीत असं भास्कर जाधव म्हणाले.

मुंबई - केलेल्या पापातून कुठेतरी मुक्तता मिळावी. सातत्याने बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन त्यांनी केलेले पापानं मन खात असावं. तुमच्या सुपुत्राला आम्ही मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचलं हे आम्ही पाप केले. त्याबद्दल ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन नाक घासत असावेत. त्याशिवाय त्यांच्याकडे श्रद्धा नाही, प्रेम नाही आणि आस्था नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यासाठी भाजपा-शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. तत्पूर्वी मोदी मुंबई येण्याअगोदर शिंदे गटातील नेत्यांनी दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले त्यावरून भास्कर जाधवांनी टीकास्त्र सोडलं. भास्कर जाधव म्हणाले की, मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढलेत. त्यात ते आता मुंबईत येतायेत याचा अर्थ मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. ज्या राज्यात, ज्या भागात निवडणुका असतात त्या डोळ्यासमोर ठेवूनच मोदी तिथे जातात अन्यथा इतर कधी ते जाताना दिसत नाहीत असा आरोप जाधवांनी केला. 

तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी कोरोना काळात संकटात सापडली होती तेव्हा मोदी मुंबईत आले नाहीत. विशेष काळजी घेताना दिसले नाहीत. परंतु पूर्वी सत्तेत असणाऱ्यांनी केलेले महापालिका उपक्रम, चांगली कामे उद्धाटन, भूमिपूजन करायचे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषण करायचं ही मोदींची खासियत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यातून मुंबई आणि महाराष्ट्राला काही मिळणार नाही असा आरोपही भास्कर जाधवांनी केला. 

मुंबई महापालिका हातातून जाणार, शिंदे गटाचा दावाज्या रस्त्याच्या निविदा निघाल्या नाहीत. कामाला सुरूवात झाली नाही. त्यात भ्रष्टाचार होतो? नेमका भ्रष्टाचार कधी होतो हे आदित्य ठाकरेंना समजणं गरजेचे आहे. आदित्य ठाकरेंना स्वप्न कसं पडलं हे माहिती नाही. ही मुंबई महापालिका आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे असा दावा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. 

भरत गोगावले म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ४५० किमी रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे होणार आहेत. मागच्या सत्ताधाऱ्यांना का सुचलं नाही हे माहिती नाही. मुंबईतील रस्ते आता चांगले होतील. त्याचे श्रेय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल. आपण काही करू शकलो नाही. त्यामुळे टीकाटीप्पणी करायची म्हणून करतात असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. तसेच पायाभरणी केली त्याचं उदाहरण दाखवा. तुमच्यात धमक नव्हती म्हणून कामे केली नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहेत म्हणून कामे देऊन टाकली. आमचा नाद करायचा नाही. तुम्ही काही करू शकले नाही हे मान्य करा. आम्ही चुकलो तर ते सांगा पण चुकलो नसेल तर तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. वर्षोनुवर्षे महापालिका ताब्यात असूनही सुशोभिकरण, रस्ते कॉक्रिंटीकरण दिसले नाही का? असा सवालही गोगावले यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे