शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

बाळासाहेबांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री खुर्चीवरून खाची खेचण्याचं पाप केलेले...भास्कर जाधवांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:35 IST

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी कोरोना काळात संकटात सापडली होती तेव्हा मोदी मुंबईत आले नाहीत असं भास्कर जाधव म्हणाले.

मुंबई - केलेल्या पापातून कुठेतरी मुक्तता मिळावी. सातत्याने बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन त्यांनी केलेले पापानं मन खात असावं. तुमच्या सुपुत्राला आम्ही मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचलं हे आम्ही पाप केले. त्याबद्दल ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन नाक घासत असावेत. त्याशिवाय त्यांच्याकडे श्रद्धा नाही, प्रेम नाही आणि आस्था नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यासाठी भाजपा-शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. तत्पूर्वी मोदी मुंबई येण्याअगोदर शिंदे गटातील नेत्यांनी दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले त्यावरून भास्कर जाधवांनी टीकास्त्र सोडलं. भास्कर जाधव म्हणाले की, मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढलेत. त्यात ते आता मुंबईत येतायेत याचा अर्थ मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. ज्या राज्यात, ज्या भागात निवडणुका असतात त्या डोळ्यासमोर ठेवूनच मोदी तिथे जातात अन्यथा इतर कधी ते जाताना दिसत नाहीत असा आरोप जाधवांनी केला. 

तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी कोरोना काळात संकटात सापडली होती तेव्हा मोदी मुंबईत आले नाहीत. विशेष काळजी घेताना दिसले नाहीत. परंतु पूर्वी सत्तेत असणाऱ्यांनी केलेले महापालिका उपक्रम, चांगली कामे उद्धाटन, भूमिपूजन करायचे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषण करायचं ही मोदींची खासियत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यातून मुंबई आणि महाराष्ट्राला काही मिळणार नाही असा आरोपही भास्कर जाधवांनी केला. 

मुंबई महापालिका हातातून जाणार, शिंदे गटाचा दावाज्या रस्त्याच्या निविदा निघाल्या नाहीत. कामाला सुरूवात झाली नाही. त्यात भ्रष्टाचार होतो? नेमका भ्रष्टाचार कधी होतो हे आदित्य ठाकरेंना समजणं गरजेचे आहे. आदित्य ठाकरेंना स्वप्न कसं पडलं हे माहिती नाही. ही मुंबई महापालिका आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे असा दावा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. 

भरत गोगावले म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ४५० किमी रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे होणार आहेत. मागच्या सत्ताधाऱ्यांना का सुचलं नाही हे माहिती नाही. मुंबईतील रस्ते आता चांगले होतील. त्याचे श्रेय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल. आपण काही करू शकलो नाही. त्यामुळे टीकाटीप्पणी करायची म्हणून करतात असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. तसेच पायाभरणी केली त्याचं उदाहरण दाखवा. तुमच्यात धमक नव्हती म्हणून कामे केली नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहेत म्हणून कामे देऊन टाकली. आमचा नाद करायचा नाही. तुम्ही काही करू शकले नाही हे मान्य करा. आम्ही चुकलो तर ते सांगा पण चुकलो नसेल तर तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. वर्षोनुवर्षे महापालिका ताब्यात असूनही सुशोभिकरण, रस्ते कॉक्रिंटीकरण दिसले नाही का? असा सवालही गोगावले यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे