शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘पोलखोल प्लॅन’; भाजपा अडचणीत येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 12:34 IST

मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांच्यावर उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा टाकला आहे. तर कितीही दावे दाखल करा तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणारच असं प्रतिआव्हान भाजपा नेते किरीट सोमय्यांकडून दिलं जात आहे.

ठळक मुद्दे सोमय्यांच्या यांच्या आरोपावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी दखल घेत भाजपाला जशास तसं उत्तर देण्याची तयारी केली आहेराज्यात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले होते.

 मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यासह सरकारमधील विविध मंत्र्यांवर एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहेत. किरीट सोमय्यांच्या या आरोपामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा सुरु आहे. मंत्री हसन मुश्रीफ, अनिल परब यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहेत. मंत्र्यांकडून या आरोपाचं खंडन केले जात आहे.

मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांच्यावर उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा टाकला आहे. तर कितीही दावे दाखल करा तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणारच असं प्रतिआव्हान भाजपा नेते किरीट सोमय्यांकडून दिलं जात आहे. सोमय्यांच्या यांच्या आरोपावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी दखल घेत भाजपाला जशास तसं उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी मागील फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची माहिती ठाकरे सरकार बाहेर काढणार असल्याची माहिती आहे. ABP नं असं वृत्त दिलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपा सरकार काळातील घोटाळे बाहेर आणण्यासाठी पोलखोल प्लॅन आखण्यात आला आहे. त्यासाठी विशेष समिती तयार केल्याची माहिती आहे. आगामी काळात भाजपाच्या माजी मंत्र्यांची विविध प्रकरणं बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपाला भाजपा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजपा अडचणीत येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

काय आहे प्रकरण?

राज्यात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कोल्हापूरच्या मातीत येऊन शड्डू ठोकणार होते; परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना भल्या सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड येथे उतरविले आणि त्यानंतर दिवसभर नेतेमंडळींच्या आरोपांच्या फैरी झडल्या. कोल्हापूरला जाऊ न दिल्याने सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले होते. ठाकरे कुटुंबीयांच्या बेनामी संपत्तीची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याची माहिती घेण्यासाठी आणि बेनामी मालमत्तेचा हिशेब करण्यासाठी लवकरच अलिबागला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या माध्यमातून, माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप सोमय्या यांनी येथे केला होता.

 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाAnil Parabअनिल परबHasan Mushrifहसन मुश्रीफUddhav Thackerayउद्धव ठाकरे