शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘पोलखोल प्लॅन’; भाजपा अडचणीत येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 12:34 IST

मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांच्यावर उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा टाकला आहे. तर कितीही दावे दाखल करा तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणारच असं प्रतिआव्हान भाजपा नेते किरीट सोमय्यांकडून दिलं जात आहे.

ठळक मुद्दे सोमय्यांच्या यांच्या आरोपावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी दखल घेत भाजपाला जशास तसं उत्तर देण्याची तयारी केली आहेराज्यात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले होते.

 मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यासह सरकारमधील विविध मंत्र्यांवर एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहेत. किरीट सोमय्यांच्या या आरोपामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा सुरु आहे. मंत्री हसन मुश्रीफ, अनिल परब यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहेत. मंत्र्यांकडून या आरोपाचं खंडन केले जात आहे.

मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांच्यावर उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा टाकला आहे. तर कितीही दावे दाखल करा तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणारच असं प्रतिआव्हान भाजपा नेते किरीट सोमय्यांकडून दिलं जात आहे. सोमय्यांच्या यांच्या आरोपावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी दखल घेत भाजपाला जशास तसं उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी मागील फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची माहिती ठाकरे सरकार बाहेर काढणार असल्याची माहिती आहे. ABP नं असं वृत्त दिलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपा सरकार काळातील घोटाळे बाहेर आणण्यासाठी पोलखोल प्लॅन आखण्यात आला आहे. त्यासाठी विशेष समिती तयार केल्याची माहिती आहे. आगामी काळात भाजपाच्या माजी मंत्र्यांची विविध प्रकरणं बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपाला भाजपा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजपा अडचणीत येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

काय आहे प्रकरण?

राज्यात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कोल्हापूरच्या मातीत येऊन शड्डू ठोकणार होते; परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना भल्या सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड येथे उतरविले आणि त्यानंतर दिवसभर नेतेमंडळींच्या आरोपांच्या फैरी झडल्या. कोल्हापूरला जाऊ न दिल्याने सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले होते. ठाकरे कुटुंबीयांच्या बेनामी संपत्तीची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याची माहिती घेण्यासाठी आणि बेनामी मालमत्तेचा हिशेब करण्यासाठी लवकरच अलिबागला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या माध्यमातून, माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप सोमय्या यांनी येथे केला होता.

 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाAnil Parabअनिल परबHasan Mushrifहसन मुश्रीफUddhav Thackerayउद्धव ठाकरे