शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यात कोसळणार?; भाजपा नेत्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 12:05 IST

कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

नागपूर - राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे तर सर्वाधिक जागा मिळूनही राज्यात भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. मात्र कर्नाटकमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने बाजी मारली. त्याचे पडसाद राज्यातही उमटताना दिसत आहे. 

भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार गिरीश व्यास यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दावा केला आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल. इतकचं नाही तर भाजपाने निवडणुकीची तयारीदेखील केली आहे. त्या निवडणुकीत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. कर्नाटकात जनतेच्या जनादेशाचा विजय झाला आहे. काँग्रेस आता लोकांची विश्वासघात करु शकणार नाही. हा संदेश संपूर्ण देशात गेला असेल की जर कोणी जनतेच्या पाठित खजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच जनता त्यांना शिक्षा देते. जनतेने भाजपाला नवी ताकद दिली आहे अशा शब्दात नरेंद्र मोदींनी कर्नाटक विजयावर भाष्य केलं होतं. 

तर जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात,जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात,त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते,याचे उदाहरण कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे.जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला आहे. 

याचदरम्यान, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावर अजित पवारांनी हवापाण्याच्या गप्पा झाल्या असं स्पष्टीकरण केले असले तरी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आशावादी असल्याचं दाखवून दिलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा जन्मच मुळात कामाच्या आधारावर किंवा विकासाच्या नावावर झालेला नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचा जन्म सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपायी झाला आहे. महाराष्ट्र आघाडीचा जन्म जनादेशाचा अवमान करत, महाराष्ट्राचा अपमान करत झालेला आहे. तसेच लवकरच गोड बातमी महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात ती येऊ शकते असं सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Vyasगिरीश व्यासSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv Senaशिवसेना