शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर; ठाकरे सरकारची आरक्षणाच्या मुद्यांवरून कसोटी लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 08:19 IST

नोकरीत पदोन्नतीतील आरक्षणावरून तणाव; ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर टाच

- यदु जोशीमुंबई : विविध प्रवर्गांच्या आरक्षणाचे मुद्दे ऐरणीवर आल्याने आता त्यातून मार्ग कसा काढायचा, हे मोठे आव्हान राज्यातील महाविकास आघाडी सरकारसमोर दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने नवा मुद्दा ऐरणीवर आला आहे.मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यानंतर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई पुन्हा एकदा लढणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत मराठा आरक्षणासाठी केंद्रावर दबाव आणणे आणि त्याचवेळी मराठा समाजाचे नवीन सवलती देऊन तूर्त समाधान करणे अशा तीन आघाड्यांवर ठाकरे सरकारला काम करावे लागणार आहे.पदोन्नतीतील आरक्षण रद्द झाल्याने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी आणि विशेष मागास प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणावर ७ मे रोजीच्या शासन आदेशाने टाच आली आहे. हा शासन आदेश कायम ठेवावा, असा दबाव दुसरीकडे अन्य समाजासाठी न्यायालयीन व इतर प्रकारची लढाई लढणाऱ्यांकडून सरकारवर आहे व त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान ठाकरे सरकारसमोर आहे.५० टक्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याचे कारण देत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले. त्यावरील पुनर्विचार याचिका राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती; पण ती देखील फेटाळण्यात आल्याने आता ओबीसी समाजातही तीव्र नाराजी आहे. मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसींचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही, असा हल्लाबोल भाजपने सुरू केला असून काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर देत आधीचे सरकार त्यासाठी कारणीभूत असल्याची टीका केली आहे.धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आता आंदोलनाचे पडघम वाजू लागले आहेत. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. त्याच दिवशी धनगर आरक्षणाचा जागर करण्याचे आ. गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे. धनगर समाजासाठी जाहीर झालेल्या योजनांची अंमलबजावणी तत्काळ करा, ही मागणी रेटली जाणार आहे.आरक्षणाचा विषय घटनापीठापुढे न्यासर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. कोर्टाने वारंवार सांगूनही केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करून आकडेवारी दिली नाही. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केले. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली असली तरी आता राज्य सरकारने हा विषय घटनापीठापुढे घेऊन गेले पाहिजे आणि ओबीसी समाजाला न्याय दिला पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती हे कळले पाहिजे, असे कोर्टाने सांगूनही केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसशासनाच्या नाकर्तेपणाचा फटकास्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतची राज्य शासनाची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे या संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवूनसुद्धा कोणतीही कारवाई शासनाने केली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना १५ महिन्यांमध्ये ८ वेळा सरकारने केवळ तारखा मागितल्या. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण