शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, कसे शिकायचे? जिल्हा परिषद शाळांत शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 08:19 IST

सरकारला केव्हा येणार जाग? ट्रायबल फोरमचा सवाल; साडेतीन वर्षे भरती नाही

अमरावती : राज्यात २०११ पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती २०१९ मध्ये उठविण्यात आली. मात्र, साडेतीन वर्षे लोटूनही शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १८ हजारांवर पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या ‘पीटीआर`नुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते. सध्या याच पटसंख्येच्या आधारावर मंजूर असलेल्या पदांपैकी १८ हजारांवर पदे रिक्त आहेत. २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल’ आणून शासनाने शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २०१९ च्या डिसेंबरमध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली.

पावणेदोन लाख डीएड, बीएडधारकांनी ही परीक्षा दिल्यानंतर केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. सध्या कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले आहे. 

राज्यात ५० हजारांवर शिक्षकांचा तुटवडानगरपालिका, महापालिका, खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा येथील रिक्त पदांचा कानोसा घेतल्यास ५० हजारांवर शिक्षकांचा राज्यात तुटवडा आहे. 

जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीब, सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षक भरतीला प्राधान्य द्यावे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.     ॲड. प्रमोद घोडाम,     संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम

शिक्षकांच्या रिक्त पदांवर नजर...

जिल्हा    मराठी    उर्दू अहमदनगर    ३४७    २७ अकोला    २८८    १२१ अमरावती    ३२०    ०४ औरंगाबाद    ५६९    ९६ बीड    ४११    ७५ भंडारा    ३०८    -बुलडाणा    १७३    ७६ चंद्रपूर    २०४    -धुळे    ३२१    २७ गडचिरोली    २६५    -गोंदिया    २९१    -हिंगोली    ८७    -जळगाव    ३६३    १९७ जालना    २०३    ३१ कोल्हापूर    ९७२    १८ नागपूर    ७६९    ०१ नांदेड    ७३२    ५६ नंदुरबार    ३४५    ३२ नाशिक    ५३१    ०३ पालघर    १९१६    -

जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांची संख्या १८ हजारांवर आहे. रोस्टरनुसार मराठी माध्यमाची १६ हजार ७४८ आणि उर्दू माध्यमाची १३०१ पदे रिक्त आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र