शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Tauktae Cyclone: ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे वीजयंत्रणेला धोका; हाय अलर्ट जारी, महावितरणची यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 6:31 AM

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा; प्रशासनाने दिले निर्देश

ठळक मुद्देतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्याचक्रीवादळामुळे १४ मे १८ मेदरम्यान काही गाड्या अहमदाबादपर्यंतच धावणार आहेत.  पाणी साचेल किंवा वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल, तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार

मुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अरबी समुद्रातील ‘तौत्के   चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह तडाखा बसणार आहे. या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला आहे. 

कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या ५० गाड्या रद्द  तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या  १५ ते २१ मेदरम्यान दादर-भूज, बांद्रा टर्मिनस-भूज, मुंबई सेंट्रल-ओखा, बांद्रा टर्मिनस-भावनगर टर्मिनस, भावनगर-बांद्रा टर्मिनस भूज-बांद्रा टर्मिनस, पुणे-भूज यांसह ५०हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळामुळे १४ मे १८ मेदरम्यान काही गाड्या अहमदाबादपर्यंतच धावणार आहेत.        

अशी करणार व्यवस्थास्थानिक प्रशासन व पोलीस विभागाशी समन्वय ठेवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणी साचेल किंवा वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल, तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर ठिकाणांहून अभियंते व कर्मचारी संबंधित दुरुस्ती कामासाठी पाठविण्यात येणार आहेत.

पर्यायी व्यवस्थेतून करणार वीजपुरवठा सुरळीतकमी नुकसान व्हावे यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. आवश्यक यंत्रसामग्रीचा साठा करून ठेवण्यात येत आहे. यामध्ये विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईल व इतर तांत्रिक साहित्यांचा समावेश आहे. सर्व एजन्सीजना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. - विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण

मुंबईचे तापमान ३७.४०अरबी समुद्रात उठलेल्या ताउके या चक्रीवादळाने धडकी भरविली असतानाच दुसरीकडे मुंबईकरांना वाढत्या कमाल तापमानाने घाम फोडला आहे. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३७.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, सरासरी कमाल तापमानाच्या तुलनेत शनिवारीचे कमाल तापमान तीन अंशांनी अधिक नोंदविण्यात आले. वाढते कमाल तापमान, चक्रीवादळाने हवामानात झालेला बदल, ढगाळलेली मुंबई आणि उकाड्यात झालेल्या वाढीने मुंबईकर घामाघूम झाले आहेत. ३७.४ अंश ही नोंद यंदाच्या हंगामातील उच्चांक आहे. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळmahavitaranमहावितरणwestern railwayपश्चिम रेल्वे