शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

ठाकरे-पवारांवर निशाणा; घराणेशाहीवर बोट; गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातून फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 06:40 IST

"शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत."

जळगाव/ छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जी भाच्याचे, तर स्टॅलिन मुलाचे भवितव्य शोधण्यात व्यस्त आहेत. शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत. नरेंद्र मोदी मात्र विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात व्यस्त आहेत, असा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभेत विरोधकांचा समाचार घेतला.

जळगावमध्ये मंगळवारी ‘युवा संवाद’ कार्यक्रम झाला. छ. संभाजीनगर येथे त्यांची सभा झाली. जळगावच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी अकोला येथे सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.

विकासाचा बायोडाटा पाहूनच करा मतदान - देशाच्या स्वाभिमानाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रचल्याचे सांगून, शाह यांनी शिवाजी महाराजांना प्रणाम करीत, तरुणाईला भावनिक साद घातली.- आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे, तर देशासाठी आहे. त्यामुळे तरुणाईने ताकदीने पुढे येऊन, प्रत्येकाने केलेल्या विकासाचा ‘बायोडाटा’ पाहूनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

पुन्हा ‘राहुलयान’ लाँच केले आहेएकीकडे ‘आत्मनिर्भर भारत’ बनविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २५ वर्षांचे व्हिजन ठेवले आहे. देशाची अर्थव्यवस्था २०३० मध्ये तिसऱ्या स्थानी आणण्याची व २०४७ मध्ये चंद्रावर माणूस पाठविण्यासाठी त्यांनी वज्रमूठ बांधली आहे. दुसरीकडे सोनिया गांधींनी घराणेशाहीला जपत पुन्हा ‘राहुलयान’ लाँच केले आहे, अशी बोचरी टीकाही शाह यांनी केली. '

नामकरणास कुणाची वाट पाहत होता?शहराला संभाजीनगर असे नाव दिले पाहिजे, अशी पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली. पण दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अडीच वर्षे याबाबत जाग आली नाही. सरकार अल्पमतात आले, त्यावेळी शेवटच्या क्षणी ठराव केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजलीछत्रपती संभाजीनगर : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना, सिद्धांतांना अवघा देश मानत होता आणि आजही मानतो. परंतु उद्धव ठाकरे राम मंदिराला, सर्जिकल स्ट्राइकला, छत्रपती संभाजीनगरच्या नावाला विरोध करणाऱ्या लोकांसोबत जाऊन बसले. ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असूच शकत नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत केली.

छ. संभाजीनगरमध्ये कमळ फुलवानरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी छ. संभाजीनगरमध्ये कमळ फुलविण्याचे आवाहन अमित शाह यांनी केले. मागच्या वेळी जी चूक केली, ती चूक यावेळी करू नका. नरेंद्र मोदी यांच्यासोबत ताठ मानेने बसणारा, कलम ३७० ला पाठिंबा देणारा खासदार निवडून द्या आणि मराठवाड्यातून नव्या निजामाला उखडून फेका, असे आवाहन अमित शाह यांनी केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक