शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

ठाकरे-पवारांवर निशाणा; घराणेशाहीवर बोट; गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातून फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 06:40 IST

"शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत."

जळगाव/ छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जी भाच्याचे, तर स्टॅलिन मुलाचे भवितव्य शोधण्यात व्यस्त आहेत. शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत. नरेंद्र मोदी मात्र विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात व्यस्त आहेत, असा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभेत विरोधकांचा समाचार घेतला.

जळगावमध्ये मंगळवारी ‘युवा संवाद’ कार्यक्रम झाला. छ. संभाजीनगर येथे त्यांची सभा झाली. जळगावच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी अकोला येथे सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.

विकासाचा बायोडाटा पाहूनच करा मतदान - देशाच्या स्वाभिमानाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रचल्याचे सांगून, शाह यांनी शिवाजी महाराजांना प्रणाम करीत, तरुणाईला भावनिक साद घातली.- आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे, तर देशासाठी आहे. त्यामुळे तरुणाईने ताकदीने पुढे येऊन, प्रत्येकाने केलेल्या विकासाचा ‘बायोडाटा’ पाहूनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

पुन्हा ‘राहुलयान’ लाँच केले आहेएकीकडे ‘आत्मनिर्भर भारत’ बनविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २५ वर्षांचे व्हिजन ठेवले आहे. देशाची अर्थव्यवस्था २०३० मध्ये तिसऱ्या स्थानी आणण्याची व २०४७ मध्ये चंद्रावर माणूस पाठविण्यासाठी त्यांनी वज्रमूठ बांधली आहे. दुसरीकडे सोनिया गांधींनी घराणेशाहीला जपत पुन्हा ‘राहुलयान’ लाँच केले आहे, अशी बोचरी टीकाही शाह यांनी केली. '

नामकरणास कुणाची वाट पाहत होता?शहराला संभाजीनगर असे नाव दिले पाहिजे, अशी पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली. पण दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अडीच वर्षे याबाबत जाग आली नाही. सरकार अल्पमतात आले, त्यावेळी शेवटच्या क्षणी ठराव केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजलीछत्रपती संभाजीनगर : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना, सिद्धांतांना अवघा देश मानत होता आणि आजही मानतो. परंतु उद्धव ठाकरे राम मंदिराला, सर्जिकल स्ट्राइकला, छत्रपती संभाजीनगरच्या नावाला विरोध करणाऱ्या लोकांसोबत जाऊन बसले. ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असूच शकत नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत केली.

छ. संभाजीनगरमध्ये कमळ फुलवानरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी छ. संभाजीनगरमध्ये कमळ फुलविण्याचे आवाहन अमित शाह यांनी केले. मागच्या वेळी जी चूक केली, ती चूक यावेळी करू नका. नरेंद्र मोदी यांच्यासोबत ताठ मानेने बसणारा, कलम ३७० ला पाठिंबा देणारा खासदार निवडून द्या आणि मराठवाड्यातून नव्या निजामाला उखडून फेका, असे आवाहन अमित शाह यांनी केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक