शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"…तर औरंगजेबाच्या कबरीशेजारी अबू आझमींसाठी कबर खोदून ठेवू’’, नितेश राणेंचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 22:51 IST

Nitesh Rane News: मुघल बादशाहा औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, असं म्हणत त्याचं कौतुक करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर भाजपा आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे.

मुघल बादशाहा औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, असं म्हणत त्याचं कौतुक करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर भाजपा आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. अबू आझमी यांना औरंगजेबाची एवढीच आठवत येत असेल, तर औरंगजेबाच्या कबरीशेजारीच अबू  आझमी यांच्यासाठी कबर खोदून ठेवू, अशी टीका नितेश राणे यांनी केली. 

यावेळी नितेश राणे पुढे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे औरंगजेब बादशाहाने कशा प्रकारे हाल केले होते, हे आज संपूर्ण जग पाहत आहे. स्वराज्याची लढाई ही इस्लामविरोधातच होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करून औरंगजेबाविरोधात लढा दिला. त्यावेळी सेक्युलर नावाचा शब्द अस्तित्वात नव्हता. हा शब्द काँग्रेसने रुढ केला आहे, असा दावाही नितेश राणे यांनी केला.

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबांमध्ये धर्माची लढाई नव्हती असा दावा अबू आजमी यांनी केला होता. ते म्हणााले होते की, "औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो २४ टक्के होता. भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जायचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती हे जर कोण बोलत असेल तर ते मी मानत नाही, असा दावा अबू आझमी यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद झाला होता.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली होती.

आता चौफैर टीका होऊ लागल्यानंतर अबू आझमी यांनी आज आपलं विधान मागे घेतलं. "माझ्या विधानाची मोड-तोड करून ते दाखण्यात आलं. औरंगजेब यांच्याबद्दल मी तेच वक्तव्य केलं जे इतिहासकारांनी आपल्यासमोर मांडलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणत्याही प्रकारचं अपमानजनक वक्तव्य केलं नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. माझ्या वक्तव्याला राजकीय वळण दिलं जात आहे. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जनतेचं नुकसान होतंय," असं आझमी म्हणाले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Abu Azmiअबू आझमीBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAurangzeb Tombऔरंगजेबाची कबर