अमेरिकेची बाजू घेणे भारतीय शेती आणि शेतकऱ्यांसाठी घातक

By सुनील चरपे | Updated: April 3, 2025 04:48 IST2025-04-03T04:47:45+5:302025-04-03T04:48:26+5:30

Donald Trump Tariffs Announcement: भारतासह अन्य देशांनी अमेरिकन शेतमाल व इतर वस्तूंवरील आयात शुल्क कमी करावा, यातून त्यांच्या शेतमालाची निर्यात वाढावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून जागतिक पातळीवर दबावतंत्राचा वापर करीत आहेत.

Taking sides with America is dangerous for Indian agriculture and farmers | अमेरिकेची बाजू घेणे भारतीय शेती आणि शेतकऱ्यांसाठी घातक

अमेरिकेची बाजू घेणे भारतीय शेती आणि शेतकऱ्यांसाठी घातक

- सुनील चरपे
नागपूर  - भारतासह अन्य देशांनी अमेरिकन शेतमाल व इतर वस्तूंवरील आयात शुल्क कमी करावा, यातून त्यांच्या शेतमालाची निर्यात वाढावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून जागतिक पातळीवर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. भारतीय अर्थतज्ज्ञ व नाेकरशाह अमेरिकेची बाजू घेत आहेत, हे भारतीय शेती क्षेत्र व शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक ठरणार आहे, असे परखड मत कृषी अर्थतज्ज्ञ देवेंद्र शर्मा यांनी व्यक्त केले.

भारतातील डेअरी उद्योग धोक्यात येईल
भारताने अमेरिकेच्या वाशिंग्टन ॲपल, दुग्धजन्य पदार्थ, साेयाबीन, खाद्यतेल, अक्राेड व चिकन यासह इतर शेतमालावरील आयात शुल्क कमी करण्यासाठी दबाव निर्माण करीत आहे.  याचे काही अर्थतज्ज्ञ व नाेकरशाह समर्थन करीत आहे. भारताने आयात शुल्क हटविल्यास डेअरी व पाेल्ट्री उद्याेगासाेबत शेती क्षेत्र धाेक्यात येईल.

२६ लाख सबसिडी
अमेरिका प्रतिशेतकरी २६ लाख रुपये सबसिडी देत असून, भारतीय शेतकऱ्यांना पीएम किसान निधीच्या रूपाने वर्षाकाठी सहा हजार रुपयांची सबसिडी दिली जाते. अमेरिका त्यांच्या कापूस उत्पादकांना दरवर्षी एक लाख डाॅलरची सबसिडी देते, तर भारतात ती २७ डाॅलर एवढी आहे.

अमेरिकेचा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा 
डाेनाल्ड ट्रम्प यांच्या मते, भारत त्यांच्या शेतमालाच्या आयातीवर सरासरी ३७.५ टक्के, तर अमेरिका भारतीय शेतमालाच्या आयातीवर सरासरी ५.३ टक्के आयात शुल्क आकारते. हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे. 
भारत अजूनही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने मंजूर केलेल्या टॅरिफचे पालन करीत असून, अमेरिका वारंवार उल्लंघन करीत आहे. अमेरिकेने भारताविरुद्ध नऊ हजार नाॅन टॅरिफ लावले आहे, तर भारताचे अमेरिकेविरुद्ध ६०९ नाॅन टॅरिफ लावले आहे. असे असूनही त्यांची ६० टक्के निर्यात प्रभावित झाली आहे, असे देवेंद्र शर्मा यांनी सांगितले. 

प्रत्येक वेळी शेतीक्षेत्रानेच त्याग का करावा? आज भारतीय शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. सबसिडीअभावी भारतीय शेतकरी अमेरिकन शेतकऱ्यांशी स्पर्धा करू शकत नाही. भारताला अमेरिकेच्या कुठल्याही शेतमालाची गरज नाही. भारताने अमेरिकेसमाेर गुडघे टेकून शेती व शेतमालावर आधारित उद्याेग धाेक्यात आणू नये.  - देवेंद्र शर्मा, कृषी अर्थतज्ज्ञ

Web Title: Taking sides with America is dangerous for Indian agriculture and farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.