शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

'जात पडताळणीवरून लगेच अपात्रतेची कार्यवाही करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:45 AM

राखीव प्रभागातून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जात पडताळणी दाखला सादर न केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपात्र ठरविण्याची कार्यवाही तातडीने करावी

मुंबई : राखीव प्रभागातून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जात पडताळणी दाखला सादर न केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपात्र ठरविण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पाठविले आहे.निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन अनिवार्य आहे. ते न करणे न्यायालयाचा अवमान ठरेल. आम्ही पत्र दिल्याने राज्य सरकारची यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याबाबत कळवेल. ग्रामपंचायतींपासून महापालिकेपर्यंतच्या सर्व निवडणुकांची कार्यवाही राज्य निवडणूक आयोग करते. न्यायालयाच्या निकालाने कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणते लोकप्रतिनिधी अपात्र ठरले आहेत, याची माहिती सरकारकडून आल्यानंतर तेथे पोटनिवडणूक घेण्याचा विचार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने हजारो लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होणार आहे.>पोटनिवडणुका होणारराखीव जागांवर निवडून आलेल्या हजारो लोकप्रतिनिधींच्या पदांवर गंडांतर येणार आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी अपात्रतेचे आदेश काढून, त्या-त्या जागा रिक्त झाल्याचे जाहीर केले, अशा सर्व ठिकाणी पोटनिवडणुका होतील.