शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

आमदारांचे निलंबन कायम राहणार..! सत्तापक्षाचे एकमत; अध्यक्षांसाठी राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 08:19 IST

सभागृहात अभूतपूर्व गदारोळ आणि उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ, हाणामारी करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांना सोमवारी निलंबित करण्यात आले होते. मात्र मंगळवारी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकल्याचे लक्षात येताच निलंबन मागे घेतले जाईल अशी चर्चा सुरू झाली.

अतुल कुलकर्णी -मुंबई : भाजपाच्या ‘त्या’ १२ आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांचे मंगळवारी एकमत झाले. याच कालावधीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासाठी राज्यपालांनीच तारीख ठरवून दिली पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे यावरूनही आता वेगळे राजकारण रंग घेईल.सभागृहात अभूतपूर्व गदारोळ आणि उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ, हाणामारी करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांना सोमवारी निलंबित करण्यात आले होते. मात्र मंगळवारी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकल्याचे लक्षात येताच निलंबन मागे घेतले जाईल अशी चर्चा सुरू झाली. त्यावर एक ज्येष्ठ नेते म्हणाले, कोणत्याही स्थितीत निलंबनाचा कालावधी कमी केला जाणार नाही. विधानसभेच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदा घडला आहे. त्यामुळे या चुकीला जर माफी केली तर कोणीही सदस्य कसेही वागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही १८ सदस्यांनी गोंधळ घातला असता तर १८ जणांचे निलंबन केले असते असे जाहीर केले. ज्या पद्धतीने भाजप सदस्यांचे वागणे होते व सतत सत्ताधाऱ्यांना दडपणाखाली ठेवण्याचे प्रकार चालू आहेत त्याला आता जशास तसेच उत्तर दिले जाईल असेही एका नेत्याने स्पष्ट केले. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत निलंबन मागे घ्यायचे नाही, एक वर्ष जैसे थे परिस्थिती ठेवायची असा निर्णय तीनही पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याला दुजोरा दिला आहे. तर याआधी २२ मार्च २०१७ रोजी फडणवीस सरकारने १९ सदस्य निलंबित केले होते हे विसरू नये अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली.दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाईल असेही वृत्त आहे. यासाठी जी कार्यपद्धती आहे त्यानुसार, सरकारने राज्यपालांना अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी पत्र दिले पाहिजे. त्या पत्रानंतर राज्यपाल जी तारीख देतील त्या तारखेच्या एक दिवस आधी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. बदलत्या राजकीय परिस्थितीत जर राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडीची तारीखच दिली नाही तर काँग्रेसला अध्यक्षपद लवकर मिळणे कठीण आहे. मात्र याआधी राज्यपालांनी स्वत:हून दोन वेळा अध्यक्षपद लवकर भरावे असे पत्र दिले आहे. एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व दुसरे विधिमंडळाला लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तारीख द्या असे कळवल्यानंतर राज्यपालांना ती तारीख द्यावी लागेल, असे विधिमंडळातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. हे घटनात्मक पद आहे. ते भरण्याची तयारी सरकारने दाखवल्यास फार काळ रिक्त ठेवता येणार नाही.  राज्यपालांनी तारीख दिली नाही तर ते राजकारण करत असल्याचा आक्षेप येईल आणि तसा आक्षेप ते घेतील का? असा सवालही त्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग म्हणावा तेवढा मोकळा राहिलेला नाही.

दुसऱ्या दिवशीही भाजप सदस्याचे गैरवर्तन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गैरवर्तनामुळे १२ सदस्य निवृत्त झालेले असताना, भाजपने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला असताना, दुपारी अचानक विधानसभेत आ. रवी राणा एकटेच आले. अंगावर मागण्यांचे बॅनर लावलेले होते. ते थेट अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेले. तेथे ठेवलेला राजदंड त्यांनी उचलला आणि तो सभागृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवच होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी राजदंड पुन्हा जागेवर आणून ठेवला व रवी राणा सभागृहाबाहेर गेले. ही कृती करणाऱ्या राणा यांनाही निलंबित करा, अशी मागणी काही सदस्यांनी केली होती. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे