शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

आमदारांचे निलंबन; न्यायालयात जाऊन उपयोग नाही, तज्ज्ञांचे मत; भाजपच्या हाती काय लागणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 08:44 IST

विरोधकांनी सभागृहात पूर्ण कोरम असल्याशिवाय अध्यक्षाची निवडणूक घेऊ नये, असा दावा केला तर काय होईल, असे विचारले असता कळसे म्हणाले, बारा आमदार एक वर्षासाठी सभागृहात येऊ शकणार नाहीत.

अतुल कुलकर्णी -मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने षडयंत्र रचून भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असा दावा निलंबित आमदार आशिष शेलार यांनी केला असला तरी, त्यातून काहीही साध्य होणार नाही, असे मत विधिमंडळ तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. निलंबनाची प्रक्रिया कायदेशीररीत्या पार पाडली गेली आहे. त्यामुळे हा विषय न्यायालयात गेला तरी प्रसिद्धीशिवाय भाजपच्या हाती फार काही लागणार नाही.विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांना विचारले असता ते म्हणाले, रीतसर पद्धतीने मंजूर झालेल्या प्रस्तावाला आव्हान कसे देणार? हा प्रस्ताव बेकायदेशीर आहे, असे कसे म्हणणार? त्यामुळे यावर न्यायालय हस्तक्षेप करेल, असे आपल्याला वाटत नाही. या निर्णयानंतर विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक घेता येईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

विरोधकांनी सभागृहात पूर्ण कोरम असल्याशिवाय अध्यक्षाची निवडणूक घेऊ नये, असा दावा केला तर काय होईल, असे विचारले असता कळसे म्हणाले, बारा आमदार एक वर्षासाठी सभागृहात येऊ शकणार नाहीत. सभागृहातील कोणतेही अधिकार त्यांना असणार नाहीत. हे निलंबन सभागृहाच्या कामकाजात पुरते केले गेले आहे. 

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड ही सभागृहाच्या कामकाजाचा भाग आहे. त्यामुळे त्यांना या निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार नाही किंवा अध्यक्षपदासाठी मतदानही करता येणार नाही. या आधी पंजाब आणि गुजरातची विधानसभा स्थगित असतानादेखील राष्ट्रपतींची निवडणूक झाली होती. त्यामुळे काही सदस्य निलंबित आहेत म्हणून निवडणूक घेता येणार नाही, अशी कोणतीही तरतूद विधिमंडळाच्या कायद्यात नाही. अध्यक्षांची निवडणूक विधानसभेच्या कामकाजाचा एक भाग आहे, असेही कळसे म्हणाले. 

तालिका अध्यक्षांचे अधिकार?- भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना अध्यक्षांचे अधिकार प्राप्त होत नाहीत, अशी चर्चाही काही आमदारांनी सुरू केली आहे. मात्र विधिमंडळाचे कायदे या बाबतीत अत्यंत सुस्पष्ट आहेत. - तालिका अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष जर विधानसभेत अध्यक्षांच्या आसनावर बसून कामकाज चालवत असतील, तर त्यावेळी त्यांना अध्यक्षांचे सगळे अधिकार लागू होतात. त्यावेळी ते पूर्ण अध्यक्षच असतात. त्यामुळे अशी चर्चा करून विषयांतर करण्यापलीकडे काहीही साध्य होत नाही, असेही अनंत कळसे म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAshish Shelarआशीष शेलार