शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आमदारांचे निलंबन; न्यायालयात जाऊन उपयोग नाही, तज्ज्ञांचे मत; भाजपच्या हाती काय लागणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 08:44 IST

विरोधकांनी सभागृहात पूर्ण कोरम असल्याशिवाय अध्यक्षाची निवडणूक घेऊ नये, असा दावा केला तर काय होईल, असे विचारले असता कळसे म्हणाले, बारा आमदार एक वर्षासाठी सभागृहात येऊ शकणार नाहीत.

अतुल कुलकर्णी -मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने षडयंत्र रचून भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असा दावा निलंबित आमदार आशिष शेलार यांनी केला असला तरी, त्यातून काहीही साध्य होणार नाही, असे मत विधिमंडळ तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. निलंबनाची प्रक्रिया कायदेशीररीत्या पार पाडली गेली आहे. त्यामुळे हा विषय न्यायालयात गेला तरी प्रसिद्धीशिवाय भाजपच्या हाती फार काही लागणार नाही.विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांना विचारले असता ते म्हणाले, रीतसर पद्धतीने मंजूर झालेल्या प्रस्तावाला आव्हान कसे देणार? हा प्रस्ताव बेकायदेशीर आहे, असे कसे म्हणणार? त्यामुळे यावर न्यायालय हस्तक्षेप करेल, असे आपल्याला वाटत नाही. या निर्णयानंतर विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक घेता येईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

विरोधकांनी सभागृहात पूर्ण कोरम असल्याशिवाय अध्यक्षाची निवडणूक घेऊ नये, असा दावा केला तर काय होईल, असे विचारले असता कळसे म्हणाले, बारा आमदार एक वर्षासाठी सभागृहात येऊ शकणार नाहीत. सभागृहातील कोणतेही अधिकार त्यांना असणार नाहीत. हे निलंबन सभागृहाच्या कामकाजात पुरते केले गेले आहे. 

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड ही सभागृहाच्या कामकाजाचा भाग आहे. त्यामुळे त्यांना या निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार नाही किंवा अध्यक्षपदासाठी मतदानही करता येणार नाही. या आधी पंजाब आणि गुजरातची विधानसभा स्थगित असतानादेखील राष्ट्रपतींची निवडणूक झाली होती. त्यामुळे काही सदस्य निलंबित आहेत म्हणून निवडणूक घेता येणार नाही, अशी कोणतीही तरतूद विधिमंडळाच्या कायद्यात नाही. अध्यक्षांची निवडणूक विधानसभेच्या कामकाजाचा एक भाग आहे, असेही कळसे म्हणाले. 

तालिका अध्यक्षांचे अधिकार?- भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना अध्यक्षांचे अधिकार प्राप्त होत नाहीत, अशी चर्चाही काही आमदारांनी सुरू केली आहे. मात्र विधिमंडळाचे कायदे या बाबतीत अत्यंत सुस्पष्ट आहेत. - तालिका अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष जर विधानसभेत अध्यक्षांच्या आसनावर बसून कामकाज चालवत असतील, तर त्यावेळी त्यांना अध्यक्षांचे सगळे अधिकार लागू होतात. त्यावेळी ते पूर्ण अध्यक्षच असतात. त्यामुळे अशी चर्चा करून विषयांतर करण्यापलीकडे काहीही साध्य होत नाही, असेही अनंत कळसे म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAshish Shelarआशीष शेलार