शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री नसूनही उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 14:33 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यावरुन राज ठाकरे, नारायण राणे आणि नवनीत राणांवर सडकून टीका केली आहे.

Maharashtra Political Crisis: गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी केल्यानंतर मोठे भगदाड शिवसेनेला पडले आहे. मात्र, आम्हीच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यातच शिवाजी पार्कवर होणारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असून, भाजपवाले पडद्यामागून मदत करत असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता मनसेनेही उडी घेतली आहे. या सर्व घडामोडींवरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे, नारायण राणे आणि राणा दाम्पत्यावर अतिशय बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. 

हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचा वारसा आम्हीच पुढे घेऊ जाऊ असा दावा मनसे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंकडून केला जात आहे. त्यात दसरा मेळावा कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात आता मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंना दसऱ्याच्या दिवशी जनतेला संबोधित करावे, अशी गळ घालण्यात येत आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी खोचक शब्दांत हल्लाबोल केला आहे. 

उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत

कोणत्याही कार्यकर्त्याला आपल्या नेत्याबाबत अभिमान वाटणे सहज स्वाभाविक आहे. आपल्या नेत्यामध्ये चांगले गुण आहे, ते नेतृत्व करण्यास सक्षम आहे, असे वाटणेही अत्यंत सहज सुलभ आहे. या न्यायाने मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्याबाबत काही वाटत असेल. तर त्याबद्दल आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलण्याची सब कंत्राटे भाजपने काढली आहे. आणि ही सब कंत्राटे मिळवण्यासाठी अनेक नेते फार उतावीण पद्धतीने पुढे आलेले आहेत. नवनीत राणा, नारायण राणे आणि राज ठाकरे ही सगळी मंडळी कंत्राट मिळवण्यासाठी फार उत्सुक आहेत. आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की, मुख्यमंत्री पदावर नसतानाही उद्धव ठाकरेंमुळे राजकीय रोजगार हमी योजनेची कामे या सगळ्यांना मिळू शकत आहेत, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. 

परंपरा कुठेतरी खंडीत झाल्यासारखी वाटते

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, दसरा मेळाव्याला देशातील तमाम हिंदुला, महाराष्ट्रातील मराठी माणसांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सोने लुटले जायचे. २०१२ नंतर ही परंपरा कुठेतरी खंडीत झाल्यासारखी वाटते. दसरा मेळावा म्हणजे हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेबांचे विचार आणि मराठी माणसांचे विचार ही जनतेला सवय झाली होती. आज जो वाद सुरू आहे तो स्थळावरून आहे असा टोला मनसेने लगावला. 

दरम्यान, ५६ वर्षांत शिवसेनेने असे ५६ लोक पाहिले. शिवसेना आणि शिवसैनिक आहे तिथे ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सुनावले. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून संभ्रम-बिंभ्रम अजिबात नाही. दसरा मेळावा आमचाच, म्हणजे शिवसेनेचाच होणार आणि शिवतीर्थावरच (शिवाजी पार्क) होणार. तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक भाग आहे, ते बघूच. पण आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असे उद्धव ठाकरेंनी ठणकावले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेNarayan Raneनारायण राणेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा