शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 13:03 IST

"खरे तर, कोणीही कुणाच्यानंतर मी, असे भाष्य करत नाही. माझी इच्छा आहे की माननीय मोदीजी आणि अमित शहा यांनीही १०० नाही २०० वर्षं जगावे..."

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातही प्रचार रंगात आला आहे. येथे काका अजित पवार विरुद्ध पतण्या युगेंद्र पवार, असे एकाच पवार कुटुंबातील दोन सदस्य समोरा-समोर आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बारामती विधानसभेकडे लागले आहे. दरम्यान, "लोकसभेला काहीतरी गंमत केली, पण आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जंमतच होईल. काही भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल की, परत कुणी वाली राहणार नाही," असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बारामतीकरांना केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रितिक्रिया देताना "कुणीही कुणाच्यानंतर मी, असे भाष्य करत नाही. ही भाषा माझ्या संस्कारात बसत नाही," असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.अजित पवार यांच्या 'वाली' या वक्तव्यावर टीव्ही९ मराठीसोबत बोलताना सुळे म्हणाल्य, "ते अजित पवार आहेत, सर्वांना त्यांच्या बोलण्याची पद्धत माहीत आहे. त्यामुळे 'राम कृष्ण हरी'. खरे तर, कोणीही कुणाच्यानंतर मी, असे भाष्य करत नाही. माझी इच्छा आहे की माननीय मोदीजी आणि अमित शहा यांनीही १०० नाही २०० वर्षं जगावे. म्हणून, ही भाषा माझ्या संस्कारात बसत नाही. माझे वैयक्तिक मत आहे की, जरी मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असले, तरी माझी इच्छा आहे की त्यांच्या सर्व नेत्यांनी १००-२०० वर्ष जगावे. आम्ही सर्वांनी लढावे. पण ही भाषा माझ्या संस्कृतीत बसत नाही."

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, हे गेले दोन महिने आम्ही सातत्याने बोलतो आहोत. आमच्यात एकसूत्रता आहे आणि एकदा आम्ही एखादी विचारधारा किंवा निर्णय घेतला की, आम्ही त्याच ट्रॅकवर राहतो, हे तुम्ही आमच्या सर्व मुलाखतींमध्ये बघितले असेल. त्यामुळे, गेली दोन महिने आम्ही हेच सांगत आहोत," असेही सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नेमकं काय म्हणाले होते अजित दादा? -"लोकसभेला काहीतरी गंमत केली, पण ठीक आहे, मी आता त्याचं काढत नाही. आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जंमतच होईल. मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही? काही भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही."

"साहेबांनी सांगितलं, दीड वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही. त्याच्यानंतर कोण बघणार आहे, याचा विचार करा आणि कुणात तेवढी धमक आहे, कुणात तेवढी ताकद आहे?" असा सवालही अजित पवार यांनी यावेली बारामतीकरांना केला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती