शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना लगावलेली चपराक स्वागतार्ह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 18:16 IST

  देशभरातील चित्रपट, नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी असहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी या मुदयांवर  भाजपला मतदान न करण्याचे, आवाहन केले होते.

ठळक मुद्देममता बॅनर्जी यांची अनिक दत्ता दिग्दर्शित ‘भोबिश्योतर भूत ’ या चित्रपटावर अनाधिकृतपणे बंदी

पुणे :  संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राजकीय पक्ष आणि नेत्यांनी राखलाच पाहिजे. सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतर एखाद्या कलाकृतीवर प्रति सेन्सॉरशीप लादणे अत्यंत चुकीचे आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला दिलेली चपराक स्वागतार्ह आहे, अशा शब्दात नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.     पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनिक दत्ता दिग्दर्शित ‘भोबिश्योतर भूत ’ या चित्रपटावर अनाधिकृतपणे बंदी घातली. या विरोधात निर्मात्याने न्यायालयाकडे धाव घेतली असता  सर्वोच्च न्यायालयाने निर्मात्याच्या बाजूने निकाल दिला. कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधातील वाढत्या असहिष्णुतेविषयी न्यायालयाने चिंता व्यक्त करीत निर्मात्याला 20 लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश ममता बॅनर्जी सरकारला ठोठावले आहेत.   देशभरातील चित्रपट, नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी असहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी या मुदयांवर  भाजपला मतदान न करण्याचे, आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल लोकमत ने कलाकार-निर्मात्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प. बंगाल सरकारला ठोठावलेला दंड म्हणजे  अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. -------निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने चित्रपटावर बंदी घालणे हा वेगळा मुददा आहे. मात्र निवडणुकीशी काही संबंध नसताना एखाद्या सरकारने चित्रपटावर अघोषित बंदी घालणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घालाच आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने निर्णय दिला असेल तर नक्कीच स्वागतार्ह आहे.-निलेश नवलाखा, निमार्ता------------------------------------------------------------चित्रपटाविषयी फारसे माहिती नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर हा प्रत्येक पक्षाने केला पाहिजे, मग सरकार कुठलेही असो. लोकशाहीने दिलेला हा मुलभूत अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने असा काही निर्णय दिला असेल तर त्याचे नक्कीच स्वागत करायला हवे.- मकरंद साठे, नाटककार-----------------------------------------------------------एकदा सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले तर सरकारने हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही. कोणाला चित्रपटाबददल आक्षेप असेल तर तो न्यायालयाचे दरवाजे नक्कीच ठोठावू शकतो. त्याला तो नक्कीच अधिकार आहे. नाटक, चित्रपट असो त्याबददल सत्तेत असलेल्यांना नेहमीच प्रॉब्लेम असतो. राज्य घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. तो हिरावून घेण्याचा कुणालाच अधिकार नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे नक्कीच स्वागत आहे. हा ख-या अर्थाने अभिव्यक्तीने स्वातंत्र्याचा विजय म्हणता येईल- रेणुका शहाणे, अभिनेत्री------------------------------------------------------------प्रादेशिक किंवा राष्ट्रीय कलाकृती असो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोकळीक दिलीच गेली पाहिजे. त्यात कोणत्याही पक्षाने अडथळा आणता कामा नये. सेन्सॉर बददल देखील आ़क्षेप आहे. सोशल मीडियावरच्या प्रत्येक कलाकृती अन सेन्सॉर्ड असतात. फक्त चित्रपट आणि मालिकांवर सेन्सॉरशीप लादली जाते. सेन्सॉर बोर्डा चा एवढा हस्तक्षेपही असता कामा नये. त्याबाबत पुर्नविचार गरजेचा आहे. कलाकृतीने समाजात तेढ निर्माण होणार नाही, कुठलाही धर्म-जात दुखावणार नाही,याचीकाळजी दिग्दर्शक आणि निर्मात्यानेही घेतली पाहिजे.- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष अखिल भारतीय चित्रपट महामंडळ -----------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेMamata Banerjeeममता बॅनर्जीcinemaसिनेमाdemocracyलोकशाहीBJPभाजपा