शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

माझा पाठिंबा प्रसारासाठी

By admin | Updated: June 16, 2015 01:48 IST

मी आजपर्यंत कधीच खेळामध्ये राजकारण केले नाही आणि करणार नाही. विजय पाटील ज्या वेळी माझ्याकडे त्यांची संकल्पना घेऊन आले तेव्हाच मला

मुंबई : मी आजपर्यंत कधीच खेळामध्ये राजकारण केले नाही आणि करणार नाही. विजय पाटील ज्या वेळी माझ्याकडे त्यांची संकल्पना घेऊन आले तेव्हाच मला त्यांच्यातील क्रिकेटविषयी असलेली तळमळ दिसली आणि मी लगेच त्यांना पाठिंबा दर्शवला, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभे असलेले क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. दरम्यान, या वेळी क्रिकेट फर्स्ट गटाचे सगळे उमेदवार आणि शिवसेना नेते सुभाष देसाई व युवानेते आदित्य ठाकरे यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.पूर्वीचे क्रिकेट प्रेक्षणीय होते. त्या तुलनेत आताचे क्रिकेट नाही. हे चित्र बदलण्यासाठी मी विजय पाटील यांना पाठिंबा दिला आहे, असे सांगतानाच ठाकरे यांनी उपस्थित मतदारांना आवाहन केले की, ३२९ लोकांच्या हातात मुंबई क्रिकेटचे भवितव्य असल्याने ही साधी निवडणूक नाही, त्यामुळेच विचार करून आपले बहुमूल्य मत योग्य व्यक्तीला द्या, असेही सांगितले.काँग्रेसच्या पाटील यांना पाठिंबा दिल्याच्या होत असलेल्या आरोपाचा या वेळी ठाकरे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. मी काँग्रेसच्या व्यक्तीला पाठिंबा दिल्याचे म्हणता तर तुम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलात याचा आधी विचार करावा, असे सांगून त्यांनी प्रतिस्पर्धी गटावर ‘बाऊंसर’ टाकला. त्याचवेळी ठाकरे यांनी विजय पाटील यांना आश्वासनही दिले की, जर त्यांचा गट विजयी झाला तर मुंबईव्यतिरिक्त डहाणू, ठाणे-डोंबिवली परिसरात क्रिकेट प्रसारासाठी जागा उपलब्ध करून देण्यास मदत करू; तसेच विजयी झाल्यावर पाटील यांच्या गटाने एमसीए क्रिकेटच्या सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही केली.मी कायमच क्रिकेटचा विचार प्रथम केला आहे. या दृष्टीनेच जेव्हा मी आमचा मुंबई क्रिकेट बाबतीतचा अजेंडा ठाकरेंसमोर मांडला तेव्हा लगेच त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला. ते स्वत: क्रिकेटप्रेमी असून, त्यांनादेखील मुंबई क्रिकेटमध्ये बदल पाहायचा असल्याने त्यांनी सर्व शक्ती आमच्या मागे उभी केली, असे डॉ. पाटील यांनी या वेळी सांगितले. तसेच ठाकरे - पाटील घराण्याचे ऋणानुबंध फार पूर्वीपासून आहेत. माझे क्रिकेट परिवर्तनाचे असलेले प्रामाणिक प्रयत्न पाहून त्यांनी लगेच मला मोठ्या भावाप्रमाणे आधार दिला, असेही त्यांनी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)या वेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी गटावर शाब्दिक हल्ला करताना म्हटले की, आज क्रिकेट खूप बदलले आहे, त्यात अनेक बदलही झाले आहेत. सुनील गावसकरपासून सचिन तेंडुलकरपर्यंत सगळे एका वेळेनंतर रिटायर्ड झाले. परंतु आमचे अध्यक्ष काही रिटायर्ड व्हायला बघत नाहीत. बरं, इतका वेळ मैदानात राहूनदेखील स्कोर काय? तर शून्य! मग कसा होणार क्रिकेटचा प्रसार? असे म्हणत सध्याच्या एमसीए कार्यकारिणीवर त्यांनी टीका केली.