शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

सरकार स्थापनेबाबत दिल्लीत होणारी बैठक शेवटची: सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 12:56 PM

शरद पवारांच्या निवासस्थानी आज काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून मिर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सरकार स्थापनेबाबत होणारी ही बैठक शेवटची असणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलताना ते म्हणाले की, शरद पवारांच्या निवासस्थानी आज काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार आहे. यात सत्तास्थापनेबाबत चर्चा होणार आहे.त्यानंतर अंतिम निर्णय सोनिया गांधी आणि शरद पवार हे घेतील. तसेच आज होणारी बैठक ही शेवटची बैठक असणार असल्याचे सुद्धा तटकरे म्हणाले.

विशेष म्हणजे याआधी सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या होत्या. मात्र त्यांनतर सुद्धा निर्णय होत नव्हता. मंगळवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची सुद्धा बैठक झाली. त्यांनतर आता आज पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. तसेच या बैठकीचा अहवाल दोन्ही पक्षाचे नेते आपल्या पक्षश्रेष्ठींकडे देणार आहेत.

तर महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाशिवआघाडीमध्ये सरकार स्थापनेवरुनचा गुंता पवारांनीच सोडवला म्हणता येईल. कारण, महाशिवआघाडीबाबतचं कोडं आता पवारांनीच उलगडलंय. 'शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. किमान समान कार्यक्रम आज निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा 2-3 दिवसात संपेल', असे शरद पवारांनी म्हटलंय.