शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ऊस दर आंदोलन चिघळणार, स्वाभिमानीचा ११ रोजी चक्का जामचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 16:03 IST

साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.

ठळक मुद्देसाखर पट्ट्यातील ऊस दर आंदोलन चिघळणार११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा

सांगली : साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.यंदाच्या ऊस हंगामात अद्याप कोणताही तोडगा निघाला नसताना साखर कारखानदारांनी परस्पर हंगाम सुरू करण्याची तयारी सुरु केली आहे, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरु करु देणार नसल्याचा इशारा दिला आहे. जर कारखाने सुरु झाले तर, एकरकमी ३२१७ रुपये मान्य असे समजू, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे स्वरुप सांगलीत जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात सर्वत्र  चक्का जाम करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या काळात महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून गावागावात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. हे आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला आहे.संघटनेतर्फे तशा आशयाची लेखी पत्रे प्रत्येक कारखान्याच्या प्रशासनाला देण्यात येणार आहेत. तोडगा न काढता दडपशाहीच्या मागार्ने हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असेही संघटनेने म्हटले आहे.दिवाळी संपताच शुक्रवार किंवा शनिवारपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतल्याने संघटनाही आक्रमक बनली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कोडोली येथील ऊस परिषदेत एफआरपी व जादा २०० रुपये देण्याची मागणी करण्यात आली.उसाला चांगला भाव देण्यासाठी प्रसंगी सरकार तिजोरी रिकामी करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यानुसार एफआरपी व जादा २०० रुपये मिळाल्याशिवाय ऊस पुरवठा करायचा नाही, असा निर्णय शेतक?्यांनीच जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत घेतला आहे.कोणत्याही कारखान्याने शेतक?्यांनी मागणी केलेले अंतिम बिल व यंदाच्या पहिल्या उचलीसंदर्भात कारखान्याची भूमिका काय आहे? याबद्दल स्पष्ट केलेले नाही. पोलिसांच्या बळाचा वापर करून कारखाना सुरू करणार असल्याचे आम्हाला समजले आहे. ऊसदराचे कोणतेही धोरण जाहीर न करता हंगाम सुरू केल्यास संघटना ते चालू देणार नाही, असेही म्हटले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना