शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘एफआरपी’बाबत शेतकऱ्यांचा विरोध नाही, पण शेट्टी वेठीस धरतात; शासनाच्या महाभियोक्तांची न्यायालयात टिप्पणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:23 IST

उद्या, होणार सुनावणी

कोल्हापूर : ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफ.आर.पी.ची गरज नसून राजू शेट्टी यांच्यासह पाच-सहा शेतकऱ्यांना शासन निर्णयास विरोध आहे, उर्वरित राज्यातील कोणाही ऊसउत्पादक शेतकऱ्यांना याविरुद्ध आक्षेप नाही, गेली तीन वर्षे कोणीही एक व्यक्तीने विरोध केलेला नाही, याउलट शेट्टी हेच साखर कारखानदार व राज्य सरकारला वेठीस धरत असल्याची टिप्पणी करत तीन टप्प्यांतील एफ.आर.पी चा कायदा पूर्ववत ठेवावा, अशी मागणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान महाभियोक्ता ॲड. विरेन सराफ यांनी केली.‘एफआरपी’चे तुकडे करणाऱ्या शासन निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिका प्रकरणी सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्ते श्री. राजू शेट्टी यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी सलग दोन तास बाजू मांडली. जर विषय संख्येचाच असल्यास आमची तयारी आहे, उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यास पुढच्या तारखेला हजारो शेतकऱ्यांनाच उच्च न्यायालयात न्याय मागणीसाठी उभे करण्यास परवानगी देण्याचा आग्रह ॲड. पांडे यांनी धरला. याबाबत, उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.

कारखानदारांनी सुधारित कायद्याचा आधार घेऊन चालू हंगामातील १० हजार कोटींची एफआरपी थकवली आहे. शेतकऱ्यांच्या करातून गोळा झालेल्या सरकारच्या तिजोरीतून पगार घेणाऱ्या महाभियोक्ता व ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या वर्गणीवर चालणाऱ्या राज्य साखर संघाने शेतकरी हिताची बाजू घेणे अपेक्षित होते. मात्र, दोघेही साखर कारखानदारांची बाजू घेऊन शेतकऱ्यांना मातीत गाडण्याचे काम करत आहेत. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीCourtन्यायालय