शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

राज्यातील साखर हंगाम एक डिसेंबरपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 18:50 IST

राज्यात सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे शेतात ओलावा असल्याने ऊस तोडणी लांबणीवर पडली आहे.

ठळक मुद्देयंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाल्याने गाळपासाठी केवळ ५७० लाख टन ऊस

पुणे : सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे राज्यातील ऊस गाळप हंगाम तब्बल दोन महिना लांबणीवर पडला आहे. येत्या एक डिसेंबर पासून ऊस गाळप हंगाम सुरु होणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील अधिकाºयांनी दिली. राज्यात सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे शेतात ओलावा असल्याने ऊस तोडणी लांबणीवर पडली आहे. साधारणपणे राज्यातील ऊस गाळप हंगाम १ आॅक्टोबरपासून सुरु होतो. तसेच, राज्यातील गाळप हंगामानेच देशातील ऊस गाळप हंगामाची सुरुवात होते. अजूनही राज्यातील ऊस पट्ट्यामधे पावसाची हजेरी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत गाळप हंगाम लांबेल असे सांगण्यात येत आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने दिलेली ओढ आणि यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाल्याने गाळपासाठी केवळ ५७० लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. तसेच, साखरेचे उत्पादन देखील ६० ते ६२ लाख टन होईल, असे सांगण्यात येत आहे. साखर आयुक्तालयाकडे ७० ते ७५ कारखान्यांचे परवाने तयार आहेत. येत्या दोन दिवसांत हे परवाने वितरीत करण्यात येतील, असे साखर आयुक्तालयातील अधिकाºयांनी सांगितले. राज्यात मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर गाळप हंगाम सुरु करण्यात येतो. अजूनही खातेवाटपाचा तिढा सुटला नसल्याने, हंगाम पुढच्या महिन्यात सुरु होऊ शकतो. गेल्यावर्षी राज्यातील १०२ सहकारी आणि ९३ खासगी अशा १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. तसेच, ९५१.७९ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. सलग दुसºयावर्षी उच्चांकी साखर उत्पादनाची नोंद राज्यात झाली होती. यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या ऊस पट्ट्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला. त्यातही कोल्हापूर आणि सांगली या ऊस पट्ट्यामधे पुराची तीव्रता अधिक होती. या भागातील ऊस पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. या परिणामामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन निम्म्यावर येईल, असे चित्र आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस