शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

साखर कारखाने आता भाडेतत्त्वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:40 IST

थकीत कर्जामुळे ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे.

मुंबई : थकीत कर्जामुळे ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. यामध्ये बंद कारखान्यांच्या अत्याधुनिकीकरणाचा खर्चसुद्धा भाडेत्त्वावर घेणाऱ्या कंपनीलाच करायचा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अशा दोन कारखान्यांचा करार बँकेने अलिकडेच केला.बाजारातील अडचणी, चुकीचे व्यवस्थापन अथवा अन्य कारणांमुळे संकटात येऊन कर्ज थकीत झालेले २५ साखर कारखाने महाराष्टÑ राज्य सहकारी बँकेने ताब्यात घेतले आहेत. हे कारखाने बंद पडल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकºयांचे नुकसान होत आहे. यावर मात करण्यासाठी कारखान्यांची खासगी कंपन्यांना विक्री न करता ते भाडेतत्त्वावर देण्याची योजना राज्य सरकारने आखली. त्यासंबंधी सहकार विभाग, महाराष्टÑ सहकारी विकास मंडळाचे प्रतिनिधी, बँकेच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सदस्य अविनाश महागांवकर व संजय भेंडे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये प्रारंभी बाणगंगा व भाऊसाहेब बिराजदार हे दोन साखर कारखाने २० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.बँकेच्या प्रशासकीय समितीचे सदस्य संजय भेंडे यांनी सांगितले की, काही कारखाने बंद असल्याने यंत्रसामग्रींचे अत्याधुनिकीरण करावे लागणार आहे. तसेच अन्य काही कामे करायची असल्यास त्याचा खर्च कारखाना भाडेतत्त्वावर घेणाºयांनीच करावा, असे करारात नमूद असेल. त्यासाठी येणाºया भांडवली खर्चाचा परतावा संबंधित कंपनीला मिळावा यासाठीच हा करार २० वर्षांसाठी केला जात आहे. पुढील हंगामापर्यंत आणखी पाच ते सात कारखाने अशाप्रकारे सुरू होऊन शेतकºयांच्या उसाला हक्काचे स्थान मिळावे, असा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेnewsबातम्या