शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पणन संचालकपदावर सुभाष मानेच राहणार

By admin | Updated: December 2, 2014 04:31 IST

राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष धोंडीराम माने यांचे निलंबन रद्द करण्याच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट)च्या निकालाविरुद्ध केलेली याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळल्याने

मुंबई: राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष धोंडीराम माने यांचे निलंबन रद्द करण्याच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट)च्या निकालाविरुद्ध केलेली याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळल्याने निवृत्तीच्या ऐन तोंडावर एकोपाठोपाठ एक कारवाया करून माने यांच्या हात धुवून मागे लागलेल्या राज्य सरकारला पुन्हा एकदा चपराक मिळाली.वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन राज्य शासनाची अप्रतिष्ठा करणे, लोकप्रतिनिधींशी उद्धट वर्तन करणे व वरिष्ठांशी अशोभनीय भाषेत बोलणे अशी कागदोपत्री कारणे दाखवून सरकारने डॉ. माने यांना ४ सप्टेंबर रोजी निलंबित केले होते. ‘मॅट’ने तो आदेश १३ आॅक्टोबर रोजी रद्द केला होता. त्याविरुद्ध केलेली रिट याचिका फेटाळताना, राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांविषयी रास्त व वाजवी भूमिका बाळगायला हवी, अशा कानपिचक्याही न्या. अनूप मोहता व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने दिल्या. माने यांनी सत्ताधारी नेत्यांना अडचणीचे ठरतील असे निर्णय घेतल्यानंतर सरकारने त्यांच्याविरुद्ध नानाविध प्रकारच्या कारवाया करण्याचा जो ससेमिरा लावला तो पाहता त्यांच्याविरुद्ध सरकार आकसाने कारवाई करीत असल्याचा निष्कर्ष निलंबन रद्द करताना ‘मॅट’ने काढला यात गैर काहीच नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.माने येत्या ३० डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. परंतु तोपर्यंतही ते त्या पदावर राहू येत, यासाठी सरकारने शक्य ते सर्व प्रयत्न केले. निलंबन रद्द करत असाल तर निदान आम्हाला माने यांची बदली तरी करू द्या, ही सरकारने केलेली मागणी खडपीठाने फेटाळली. नंतर आजच्या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली गेली. तीही अमान्य जाली. परिणामी सेवानिवृत्तीपर्यंत माने पणन संचालक या पदावरच राहतील, हे स्पष्ट झाले. नाही म्हणायला राज्य सरकारला दोन बाबतीत दिलासा मिळाला. ‘मॅट’ने दाव्याच्या खर्चापोटी माने यांना दोन लाख देण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयाने ही रक्कम कमी करून २० हजार केली. तसेच माने यांच्यावरील प्रस्तावित खातेनिहाय चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश ‘मॅट’ने दिला होता. खंडपीठाने ही निश्चित कालमर्यादा काढून टाकली, परंतु सरकारने वेळेत चौकशी पूर्णकरणे अपेक्षित आहे, असे न्यायालायने नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)