शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींनी जाणून घेतल्या ‘त्यांच्या’ व्यथा

By admin | Updated: March 11, 2015 00:08 IST

स्वच्छता मोहीम : वेश्या वस्तीत राबविले राष्ट्रीय स्वयंसेवक शिबिर

सांगली : येथील दसरा चौकातील सुंदरनगरमधील वेश्या महिलांच्या घरोघरी जाऊन महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून त्यांच्या घरासमोर रांगोळ्याही काढल्या. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले होते. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय (सांगलीवाडी) व राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवक शिबिराचे येथील सुंदरनगरमधील वेश्या वस्तीत आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरापासून सुमारे अडीचशे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या महिलांच्या घरात जाऊन त्यांच्या आरोग्याच्या, आर्थिक व कौटुंबिक समस्या जाणून घेतल्या. त्याच्या निराकरणासाठी उपाययोजनाही सुचवल्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. या परिसराची स्वच्छता करून प्रत्येक घरासमोर सुबक रांगोळ्याही विद्यार्थिनींनी काढल्या. यावेळी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थिनींनी सुमारे पाच तास श्रमदानही केले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणेम्हणून महापौर विवेक कांबळे, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, शिक्षणाधिकारी नीशा वाघमोडे, नगरसेविका अनारकली कुरणे, ज्योती अदाटे उपस्थित होते.वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या अध्यक्षा अमिराबी शेख (बंदव्वा) यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव दीपक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्वांनी वेश्या महिलांच्या पुनर्वसनासाठी सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वस्तीत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा, साफसफाई करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी वैभव चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)तेरा मुलांना दिले माझे नाव : विवेक कांबळेयावेळी महापौर कांबळे म्हणाले की, या महिलांच्या समस्या आपण सर्वात जवळून अनुभवल्या आहेत. घरातून बाहेर काढल्यानंतर याच वस्तीत आपण वाढलो. या महिलांच्या मुलांना पित्याचे नाव नसल्यामुळे समाजात वावरताना त्यांना खूप अवहेलना सहन कराव्या लागतात. यामुळे आजपर्यंत आपण अशा तेरा मुलांना आपले नाव दिले आहे. आज ही तेराही मुले उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, याचा आपल्याला अभिमान आहे.